महाराष्ट्र

काय सांगता? सावलीही साथ सोडणार!

नाशिक : प्रतिनिधी
आयुष्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या टप्प्यावर साथ सोडून जातो. पण एक अशी गोष्ट जी आपली साथ कधीच सोडत नाही. ती गोष्ट म्हणजे सावली. पण आता सावलीही आपली साथ सोडणार आहे. हो आश्चर्य वाटले पण हे खरे आहे. आता सावलीही आपली साथ सोडणार आहे. नाशिकमध्ये 19 मे रोजी नाशिकमध्ये शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणार्‍या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा तसेच सूर्य दररोज 0.50 अंश सरकतो. म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते. नाशिक जिल्ह्यात 19 मे रोजी शून्य सावली दिवस आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 3 मे, धुळे जिल्ह्यात 31 मे, दि. 3 मे – सावंतवाडी, शिरोडा, मांगेली, खूषगेवाडी, 4 मे – मालवण, आंबोली, 5 मे – देवगड, राधानगरी, रायचूर, 6 मे – कोल्हापूर, इचलकरंजी, 7 मे – रत्नागिरी, सांगली, मिरज, 8 मे – कर्‍हाड, जयगड, अफजलपूर, 9 मे – चिपळूण, अक्कलकोट, 10 मे – सातारा, पंढरपूर, सोलापूर, 11 मे – महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाई, 12 मे – बारामती, बार्शी, उस्मानाबाद, 13 मे – पुणे, मुळशी, दौड, लातूर, लवासा, असरल्ली, 14 मे – लोणावळा, अलिबाग, दाभाडे,पिंपरी-चिंचवड, देहू, जामखेड, आंबेजोगाई, 15 मे -मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड, माथेरान, राळेगण सिद्धी, सिरोंचा, 16 मे – बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, नारायण गाव, खोडद, अहमदनगर, परभणी, नांदेड, 17 मे – नालासोपारा, विरार, आसनगाव, अहेरी, आल्लापल्ली, 18 मे – पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा, 19 मे – औरंगाबाद, डहाणू, कोपरगाव, वैजापूर, जालना, पुसद, बल्लारशा, चामोर्शी, 20 मे – चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल, 21 मे – मनमाड, चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, रोहना, 22 मे – मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी, 23 मे – खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड, 24 मे – धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर, 25 मे – जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा, 26 मे – नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा, 27 मे – नंदुरबार, शिरपुर, बुर्‍हाणपूर, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक, 28 मे – अक्कलकुआ, शहादा, पांढुरणा, वरुड, नरखेड, 29 मे – बोराड, नर्मदा नगर, 30 मे – धाडगाव, 31 मे – तोरणमाळ यानुसार जिल्हे बदलत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago