शांतिगिरी महाराज अखेर रिंगणात, दिंडोरीत हरिश्चंद्र चव्हाण यांची माघार

बंडखोरांना शमवण्यात राजकीय पक्षांना यश
शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम
नाशिक :  प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज माघारीची शेवटची  मुदत असल्याने    अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांचे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गर्दी झाली होती. शिवसेना ठाकरे गट,  भाजपा ,राष्ट्रवादी काँग्रेस  या पक्षामध्ये बंडखोरी झाली होती. बंडखोरांचे बंड शमवण्यात महायुतीला यश आल्याचे चित्र आहे. नाशिक
मतदारसंघासाठी  महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली असली तरी भाजपच्या अनिल जाधव यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने निवृत्ती अरिंगळे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला होता.  तर दिंडोरी मतदार संघात  माजी खासदार  हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता,मात्र  त्यांनीहीमाघार घेतल्याने डाॅ.भारती पवार यांना दिलासा मिळाला आहे.  त्यामुळे महायुतीला बंड शमवण्यात यश आले मात्र  जय बाबाजी भक्त परिवाराचे  शांतिगिरी महाराज   निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे महायुतीची डोके दुखी वाढली आहे. त्यांनी माघार घ्यावी म्हणून महायुतीचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील होते, सकाळपासूनच पालक मंत्री दादा भुसे ,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ,अन्न  व नागरी पुरवठा  ग्राहक  संरक्षण  मंत्री  छगन भुजबळ , नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे या सर्वांनीच शांतिगिरी महाराज यांना उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांनी माघार घेतली नाही.
मात्र त्यांच्या मनधरणीला अपयश आल्याचे चित्र आहे.
शिवसेना ठाकरे गटाने  राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने नाराज असलेले विजय करंजकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र  सोमवारी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत उमेदवारी अर्ज माघारी घेतला.  तर दिंडोरी मतदार संघात माकापाचे उमेदवार जे पी गावित यांनी देखील माघार घेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.   त्यामुळे दिंडोरी मतदार संघात तिरंगी लढत होणार  असून नाशिक लोकसभेची निवडणूक चौरंगी होणार असल्याचे चित्र आहे.
अर्ज माघारीसाठी अनिल जाधवांची भागमभाग
नाशिक लोकसभेतून महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली असली तरी भाजपच्या अनिल जाधव यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती.  उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अवघ्या दोन मिनिट आधी अनिल जाधव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.त्यांच्यासोबत हेमंत गोडसे देखील उपस्थित होते. मात्र दोनच मिनीट बाकी असल्याने  अक्षरशा : धावपळ करतच त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय गाठले.  उमेदवारी अर्ज मागे घेण्याची त्यांची ही धावपळ पाहून एकच चर्चा रंगली होती.

Bhagwat Udavant

Recent Posts

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

16 mins ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

10 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

21 hours ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

23 hours ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago

नवरंगोत्सवाने संचारले नवचैतन्य

नवरंगोत्सवाने संचारले नवचैतन्य गृहिणी असणे सर्वांत अवघड जॉब: किरणकुमार चव्हाण नाशिक : प्रतिनिधी महिलांमध्ये उपजतच…

2 days ago