काजी सांगवी : वार्ताहर
केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात शेतकरी संतप्त झाला आहे शेतकऱ्याच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत चांदवड येथे आज सकाळी रास्ता रोको सुरू झाला आहे.
आज चांदवड येथिल मुबंई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करत आहे चांदवड तसेच राज्यातील शेतकरी आधीच अवकाळी आणि दुष्काळने कंबरडे मोडले आहे अश्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे . त्यामुळे शरद पवार यांच्या उपस्थितीत रास्ता रोको करण्यात येत आहे, या आंदोलनात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळ पिंगळे ,शहराध्यक्ष गजानन शेलार ,श्रीराम शेटे ,माजी आमदार उत्तम बाबा भालेराव,, माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल ,शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन आहेर, तालुका अध्यक्ष विलास भवर, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, नवनाथ आहेर ,शैलेश ठाकरे ,अनिल पाटील,दत्ता वाकचौरे, प्रकाश शेळके ,तुकाराम सोनवणे, रिजवान घाशी ,समाधान जामदार, कारभारी आहेर, नरेंद्र ठाकरे, तुषार शेवाळे, येवल्याचे माणिकराव शिंदे आदी सह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…