शताब्दीच्या उंबरठ्यावर वाटचाल; पायाभूत सुविधांकडे हवे लक्ष
भगूर नगरपरिषदेची सन 1925 मध्ये स्थापना झाली. गेल्या शंभर वर्षांत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे राबवली आहेत. एकूण 10 प्रभाग आणि 20 नगरसेवकांच्या प्रतिनिधित्वाखाली आजवर 38 नगराध्यक्ष भगूर शहराने पाहिले आहेत. जयवंतराव देशमुख, पां. भा. करंजकर, चिमणराव देशमुख, एकनाथ शेट्येेे, मदन लाहोटी, अकबर वकील, सौ. राहणे, सुमन बेलदार, सीताबाई जाधव, भारती साळवे, गोरख बलकवडे, विजय करंजकर, स्वाती झुटे, अनिता करंजकर यांसारख्या दिग्गजांनी नगराध्यक्षपद भूषवले आहे. स्थापनेच्या शताब्दी वर्षाआधी भगूरमध्ये मोठे प्रकल्प अपेक्षित आहेत. बदललेली राजकीय समीकरणे आणि आरक्षणाची नवी रचना या सर्वांची एकत्रित परिणती म्हणून यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी निवडणुकीत भगूरची दिशा ठरवणारे निकाल लागतील अशी अपेक्षा आहे.
नवीन जलयोजना
शहरासाठी 24.38 कोटींची नवीन जलयोजना मंजूर करण्यात आली असून, जुन्या योजनेमुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत असल्याने नवीन जलयोजना मंजूर करण्यात आली. दारणा धरणाला उद्भव मानून तीन जलशुद्धीकरण केंद्रांंची कामे सुरू आहेत. 135 लिटर प्रतिव्यक्ती पाणीपुरवठा आवश्यक आहे. सन 2056 पर्यंतच्या लोकसंख्येसाठी पुरेसा पाणीसाठा नियोजित केला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, कामे सुरू आहेत.
विकासकामे
भगूरमध्ये 24.64 कोटींची योजना अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांंतर्गत 24.64 कोटी खर्चाची भुयारी गटार योजना प्रस्तावित असून, तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आधुनिक मलनिस्सारण व्यवस्था व वैज्ञानिक प्रक्रिया, स्वच्छता सुविधांचा विस्तार, पर्यावरणपूरक शहरी विकास सुरू आहे. स्वच्छ भारत अभियानात सन 2018 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी भगूर नगरपरिषदेला पाच कोटींचे पारितोषिक मिळाले. यानंतर शहरात कचरा व्यवस्थापन बळकट करणे, तसेच वैज्ञानिक वर्गीकरण, स्वच्छता अभियान, आधुनिक संकलन साधने यांचा वापर, नियमित सफाई मोहिमा यामुळे भगूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श ठरत आहे.
मावळत्या परिषदेचे बलाबल
शिवसेना- 16
काँग्रेस- 01
नगराध्यक्ष- शिवसेना
आरक्षण रचनेनुसार जागा
सर्वसाधारण : 08
ओबीसी : 05
ओबीसी महिला : 03
एसटी पुरुष : 01
एससी महिला : 02
एससी पुरुष : 01
निवासस्थान हे ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. त्याच्या जवळच मद्यविक्री केंद्र सुरू असल्याने पर्यटकांवर नकारात्मक छाप पडते. त्या परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण आहे.
– जयश्री देशमुख, माजी सभापती, भगूर
– केतन सोनवणे, स्थानिक नागरिक, भगूर
– नीलेश गायकवाड, स्थानिक व्यावसायिक, भगूर
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…