सोनवणे जळीत कांडातील आरोपींना जन्मठेप

मनमाड:: विशेष प्रतिनिधी
मनमाड येथील अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडाचा अकरा वर्षांनंतर निकाल आज लागला, यातील तीन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली,
..मच्छीन्द्र सुरवडकर,राजू शिरसाट, अजय सोनवणे अशी आरोपींची नावे आहेत, ..२५ जानेवारी २०११ रोजी हे जाळीत कांड घडले होते, मालेगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी वाय गोंड यांनी ही शिक्षा ठोठावली .कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप ,सरकारी कामात अडथळा २ वर्ष शिक्षा ५०६ अंतर्गत ७ वर्ष अशी शिक्षा एकत्रित भोगावी लागणार आहे, अपार जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पोपट शिंदे यांनी बोलावून घेत जिवंत जाळले होते, यात आरोपी पोपट शिंदे हा देखील गंभीर भाजला होता, त्याचाही मृत्यू झाला होता, पोलीस तपासात अन्य 3 आरोपी सहभागी असल्याचे समजल्याने त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध मालेगाव येथील सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *