शिवडे बंधार्यातील गळती काढण्यात नगरपालिकेला यश
सिन्नर : प्रतिनिधी
गेल्या पाच – सहा महिन्यांपासून सुरू असलेली शिवडे बंधार्यातील जलवाहिनीची गळती काढण्यात नगरपालिका प्रशासनाला अखेर यश आले आहे. रविवारी गळती काढण्याचे सुरू झालेले काम सोमवारी (दि.29) दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ण झाले. संध्याकाळी 5 वाजेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. ही गळती काढल्यामुळे दिवसाकाठी किमान 50 लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे सिन्नरकरांना आता पूर्ण दाबाने पाणी मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. नगरपालिका वाढत्या पाण्याच्या आता कसे नियोजन करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सिन्नर नगरपालिकेने 24 एप्रिल रोजी शिवडे बंधार्यातील गळती काढण्यास प्रारंभ केल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे हे काम थांबवण्यात आले होते. पुन्हा रविवारी (दि.28) दंगा नियंत्रण पथक आणि पोलीस बंदोबस्तात गळती करण्याच्या कामास सुरुवात केली. बंधार्यातील पाणी विद्युत मोटारी टाकून आणि डोंगळ्यांच्या सहाय्याने
काढण्यात आले.
त्यानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत गळती काढण्याचे काम सुरू होते. सोमवारी ही गळती काढण्याचे काम पूर्ण झाले, मात्र काही प्रमाणात गळती राहिल्याने पुन्हा ही गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले. दुपारी तीन वाजेपर्यंत हे काम पूर्ण क्षमतेने पूर्ण झाल्यानंतर 5 वाजता कडवा धरणातून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रशांत मेश्राम यांनी दिली.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…