सिन्नर : प्रतिनिधी
मित्राच्या वाढदिवसाला जाण्यास घरच्यांनी विरोध केल्याचा राग आल्याने वरद प्रितम भालके (15) या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिन्नर येथे घडली. दहावीत गेलेल्या या विद्यार्थ्यांने राग अनावर झाल्याने हे कृत्य केल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. सिन्नरमधील देवी रोड परिसरातील राम नगरीतील अमित सुरेश गजेकर (43) यांचा भाचा वरद (15) याच्या मित्राचा शनिवारी वाढदिवस होता. यासाठी जाण्याची त्याने तयारी केली. मात्र, घरच्यांनी वाढदिवस कार्यक्रमाला जाण्यास विरोध केला. त्यामुळे तो आतल्या खोलीत जाऊन बसला. याच दरम्यान कुटुंबातील सदस्य टीव्ही बघत होते. बराच वेळ होऊनही वरद बाहेर न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडला असता वरदने गळफास घेतल्याचे आढळले. याबाबत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चेतन मोरे तपास करत आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…