सिन्नर : प्रतिनिधी
मित्राच्या वाढदिवसाला जाण्यास घरच्यांनी विरोध केल्याचा राग आल्याने वरद प्रितम भालके (15) या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिन्नर येथे घडली. दहावीत गेलेल्या या विद्यार्थ्यांने राग अनावर झाल्याने हे कृत्य केल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. सिन्नरमधील देवी रोड परिसरातील राम नगरीतील अमित सुरेश गजेकर (43) यांचा भाचा वरद (15) याच्या मित्राचा शनिवारी वाढदिवस होता. यासाठी जाण्याची त्याने तयारी केली. मात्र, घरच्यांनी वाढदिवस कार्यक्रमाला जाण्यास विरोध केला. त्यामुळे तो आतल्या खोलीत जाऊन बसला. याच दरम्यान कुटुंबातील सदस्य टीव्ही बघत होते. बराच वेळ होऊनही वरद बाहेर न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडला असता वरदने गळफास घेतल्याचे आढळले. याबाबत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चेतन मोरे तपास करत आहे.
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…
अॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…
पिंपळगावच्या व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याची तब्बल 15…