स्वराज संघटनेची स्थापना, छत्रपती संभाजी राजेंची घोषणा
पुणे : मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. अपक्ष म्हणून काही दिवसांनी होणारी राज्यसभेची निवडणूक लढविणार असून, आपण स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना करीत असल्याची घोषणा छत्रपती संभाजी राजे यांनी आज पुण्यात केली. पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. स्वराज्य हे माझ्या नव्या संघटनेचे नाव असून या संघटनेचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने आतापर्यंत छत्रपती घराण्यावर नितांत प्रेम केले आहे. या प्रेमापोटी मी महाराष्ट्र पिंजून काढू शकलो. 2007 पासून आतापर्यंत मी गोंदिया वगळता संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे. मागील 15-20 वर्षांत शेतकर्यांचे, कामगारांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊ शकलो. लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांवर प्रेम का करतात, हे मला अनुभवास मिळाले. त्यातून काम करण्याची उर्जा मला मिळाली. त्यातून काम करण्यासाठी मला एक नवी ऊर्जा मिळाली. हे लक्षात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून बोलावून मला राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्याची विनंती केली. राष्ट्रपती नियुक्त खासदाराची प्रतिष्ठा वेगळी असते. त्यामुळे मी 2016 मध्ये ते पद स्वीकारले. आगामी काळात या संघटनेचे रुपांतर पक्षात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…
नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …
राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…
आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्यांच्या…