स्वराज संघटनेची स्थापना, छत्रपती संभाजी राजेंची घोषणा
पुणे : मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. अपक्ष म्हणून काही दिवसांनी होणारी राज्यसभेची निवडणूक लढविणार असून, आपण स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना करीत असल्याची घोषणा छत्रपती संभाजी राजे यांनी आज पुण्यात केली. पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. स्वराज्य हे माझ्या नव्या संघटनेचे नाव असून या संघटनेचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने आतापर्यंत छत्रपती घराण्यावर नितांत प्रेम केले आहे. या प्रेमापोटी मी महाराष्ट्र पिंजून काढू शकलो. 2007 पासून आतापर्यंत मी गोंदिया वगळता संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे. मागील 15-20 वर्षांत शेतकर्यांचे, कामगारांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊ शकलो. लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांवर प्रेम का करतात, हे मला अनुभवास मिळाले. त्यातून काम करण्याची उर्जा मला मिळाली. त्यातून काम करण्यासाठी मला एक नवी ऊर्जा मिळाली. हे लक्षात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून बोलावून मला राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्याची विनंती केली. राष्ट्रपती नियुक्त खासदाराची प्रतिष्ठा वेगळी असते. त्यामुळे मी 2016 मध्ये ते पद स्वीकारले. आगामी काळात या संघटनेचे रुपांतर पक्षात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…