मुंबई :
देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र, उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला बसल्याने उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या बदलत्या हवामानाचे पडसाद आता महाराष्ट्रात, प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उमटणार असल्याचा अंदाज आहे.
गेल्या 24 तासांत जम्मू, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात दृश्यमानता 50 मीटरपेक्षाही कमी नोंदवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबरपासून हिमालयामध्ये एक नवीन ’वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रिय होत आहे. यामुळे उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांचा जोर वाढणार असून, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या उत्तर भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र या शीतलहरीच्या कक्षेत नसला, तरी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या लगतच्या राज्यांमध्ये होणार्या तापमानातील घसरणीमुळे महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे. विशेषत: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रतील नागपूर, गोंदिया आणि नाशिकसारख्या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानात लक्षणीय घट होऊन हुडहुडी वाढणार आहे. सध्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस तापमानाचा पारा 2 ते 4 अंशांनी घसरण्याची शक्यता
आहे.
उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रालाही तापमानामध्ये होणार्या या मोठ्या बदलाचा फटका बसू शकतो. ज्यात विमान आणि रेल्वे प्रवासाचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी जे पर्यटक उत्तर भारतात किंवा महाराष्ट्रातील उत्तर पट्ट्यात जाणार आहेत, त्यांनी थंडीमध्ये आवश्यक वस्तू घेऊनच बाहेर पडावे. तसेच धुक्यामुळे प्रवासी वाहनावर काय परिणाम होत आहे का? याची माहिती घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
Temperatures will drop, the state will be in a state of panic पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…