सातपूर भागात ठाकरे गट व राष्ट्रवादी ला खिंडार पडणार
नाशिक: प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीसाठी आतापासूनच व्ह्यूव्य रचनेला सुरुवात झाली असून, काल काँग्रेस आणि उबाठा गटाच्या तीन माजी नगरसेवकानी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता सातपूर भागातही उबाठा आणि राष्ट्रवादी ला खिंडार पडणार आहे. नाशिक पश्चिम मतदार संघातील आमदार सीमा हिरे, महेश हिरे यांनी सातपूर भागातील शिवसेना पदधिकारी यांना सोबत घेत मुंबईत मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. सातपूर भागातील रहिवासी आणि छावा क्रांतिवीर संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात नेहमी अग्रेसर भूमिका घेणारे करण गायकर यांच्या पत्नी सविता गायकर,
हेमलता कांडेकर, दिनकर कांडेकर, माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम दशरथ पाटील, शिवसेनेचे उप महानगर प्रमुख समाधान देवरे ,राष्ट्रवादी चे बाळासाहेब जाधव यांनी बावनकुळे आणि गिरीश महाजन यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली, बाळासाहेब जाधव यांचा यावेळी प्रवेश झाला, तर इतर पदाधिकारी यांचाही लवकरच प्रवेश होणार आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या प रा भ वाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपाने चांगले मोहरे गळाला लावण्याचे डावपेच आखले आहेत. आगामी काळात आणखी धक्के महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीमा हिरे यांनी नाशिक पश्चिम भागातून विजय मिळवल्याने त्या कमालीच्या सक्रिय झाल्या आहेत, महापालिका निवडणुकीत भाजप वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप कामाला लागला आहे. सातपूर भागात गायकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सविता गायकर,समाधान देवरे यांच्या प्रवाशाने भाजपला चांगला फायदा आगामी काळात होऊ शकतो, असे नागरिकांत बोलले जात आहे.
कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले राजू शेट्टी यांचा आरोप…
केवळ चर्चा, बोलणी कधी? शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…