मनपा निवडणुकीपूर्वी आणखी धक्के बसण्याची शक्यता
नाशिकरोड : अनिल गुंजाळ
नाशिकरोड म्हणजे शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला. मात्र, शिवसेनेत पडलेली फूट, संघटन कौशल्याचा अभाव, यामुळे हा बालेकिल्ला शिवसेनेच्या हातून गेला आहे. त्यांचाच एकेकाळचा मित्रपक्ष भाजपने गेल्या महापालिका निवडणुकीत शिस्तबद्ध संघटन, नियोजनाच्या जोरावर या बालेकिल्ल्यावर आपला ध्वज फडकविला. आता महापालिका निवडणुकीचा गजर होऊन पुन्हा एकदा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात असताना, भाजप हा बालेकिल्ला राखणार का, शिवसेनेचा ठाकरे गट हा बालेकिल्ला परत मिळवणार का, सेनेचा शिंदे गट किती मोठे आव्हान उभारणार, याकडे संपूर्ण नाशिकरोडकरांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाकडील अनेकजण भाजपा, शिंदे गटात गेले आहेत. काहीजण वाटेवर आहेत. माजी मंत्री बबन घोलप व त्यांच्या कन्या यांनी भाजपात जाणे पसंत केले आहे. ठाकरे गटाने दत्ता गायकवाड यांना उपनेतेपदी बढती दिली आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, ठाकरे गटापुढे गतवैभव मिळविण्याचे मोठे आव्हान आहे.
नाशिकरोड विभागात पूर्वी 11 नगरसेवक असणार्या शिवसेनेमध्ये सत्तांतरानंतर फूट पडली. यातील 4 नगरसेवक शिंदे गटात, तर 7 नगरसेवक उद्धव ठाकरे गटात राहिले. भाजपने मागील निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत 12 नगरसेवक निवडून आणून चमत्कार घडवत शिवसेनेच्या किल्ल्याला सुरूंग लावला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे फक्त एक नगरसेवक असून, राज ठाकरेंच्या मनसेचा एकही प्रतिनिधी नाशिकरोडमधून निवडून आलेला नाही. शिंदे गटाचे 5 नगरसेवक वेगळे अस्तित्व दाखवत असून, भाजप, शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), रिपब्लिकन यांची महायुती आणि अलीकडे आणखी कमजोर झालेली महाविकास आघाडी यांच्यामधील लढत पाहणे महत्त्वाचे आहे. नाशिकरोडचा महत्त्वाचा भाग असलेल्या देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादीचा (अजित पवार) आमदार आहे. घोलप घराण्याची सत्ता संपुष्टात आली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना तर अजित पवारांनी शरद पवारांना हादरा देत नवीन चूल मांडली आहे. काँग्रेसचे तर येथे अस्तित्वच नाही. त्यामुळे ठाकरेंचा समावेश असलेल्या महाआघाडीला नाशिकरोड प्रभागाची निवडणूक आव्हान ठरली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली असून, इच्छुकांची मोर्चेबांधणी वाढली आहे. काही माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार मिसळ पार्टी, विद्यार्थी गुणगौरव सोहळे, सत्कार समारंभ अशा कार्यक्रमांची रेलचेल करत पुन्हा एकदा जनतेच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत आहेत.
या सगळ्या गदारोळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे सर्वच पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. काही निष्ठावान कार्यकर्ते खासगीत बोलताना म्हणतात की, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटतोय, तरी उमेदवारी बाहेरून आलेल्यांना दिली जाते. आमच्यावर अन्याय होतोय. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावरील रुसवे-फुगवे हीदेखील या निवडणुकीत परिणामकारक ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे
मत आहे.
आगामी निवडणुकीत ठाकरे गट, शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसे यांच्यात वेगवेगळ्या आघाड्या होऊन तिरंगी वा चौरंगी लढती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कमजोर पडलेल्या ठाकरे गटाला स्वतःला सावरून पुन्हा नव्याने संघटन बांधणे आवश्यक आहे. त्यांनी विभागात कार्यकर्ते मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. मनसेलाही आपली ताकद दाखवून देणे आवश्यक आहे. नाशिकरोडमध्ये आगामी निवडणूक कोणासाठी विजयश्री घेऊन येईल आणि कोण आपला खरा ‘बालेकिल्ला’ सिद्ध करेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी हे सध्या एकत्र जरी असले तरी यांची युती किंवा आघाडी होणार नाही. जागा कमी व इच्छुक जास्त त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीमध्ये असलेले सहा पक्ष हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील तर मनसे व आरपीआय आठवले गट व वंचित बहुजन आघाडी हेसुद्धा स्वबळावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. मनसे व शिवसेना ठाकरे गट युतीचा गाजावाजा होत असला तरी दोघेही एकत्र येणे अशक्य असल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे.
सध्याचे पक्षीय बलाबल
भाजपचे माजी नगरसेवक संभाजी मोरूसकर, दिनकर आढाव, विशाल संगमनेरे, शरद मोरे, पंडित आवारे, अंबादास पगारे, संगीता गायकवाड, कोमल मेहरोलिया, अनिता सातभाई, मीरा हांडगे.
ठाकरे गट : प्रशांत दिवे, केशव पोरजे, संतोष साळवे, सुनीता कोठुळे, मंगला आढाव, डॉ. सीमा ताजणे, सत्यभामा गाडेकर यांचे निधन झाले आहे.
शिंदे गट : सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खोले, जयश्री खर्जुल, रंजना बोराडे
राष्ट्रवादी : जगदीश पवार
कॉलेजच्या रंगीत दिवसांची स्टाइल डायरी तरुणींनी कॉलेज कॅम्पसचा लूक सहज, स्टायलिश आणि व्यक्तिमत्त्वसंपन्न ठेवायचा असेल,…
पाऊस दरवर्षीच पडतो; पण प्रत्येकाचा पाऊस निराळा असतो. कुणाला तो बालपणात घेऊन जातो, कुणाला कॉलेजवयीन…
ष्टीच्या आरंभापासूनच मानवाच्या कल्पनाशक्तीला गोंधळात टाकणारे, विस्मयकारी आणि अनंत अशा अंतराळाचे गूढ अजूनही वैज्ञानिकांच्या अभ्यासाचा…
निसर्ग चैतन्यमय आहे, सारे अरण्य म्हणजे एक प्राणमय जीव आहे, त्याला त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आहे,…
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी संततधारेमुळे नाशिकरोड व परिसरात जनजीवन विस्कळीत झाले होते. पाच ते सहा…
एअरपोर्ट शैलीतील आसनव्यवस्था; प्रतीक्षालयाला नवे रूप नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी भुसावळ विभाग, मध्य रेल्वे यांनी…