२५ हुन १३ कोटी वसुली
नाशिक : प्रतिनिधी
मनपा प्रशासनाकडून दरवर्षी करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत बिल भरणा केल्यावर विशिष्ट सूट दिली जाते. यंदा एप्रिल महिन्यात कर अदा केल्यास एकूण रक्कमेवर नेहमीच्या पाच ऐवजी आठ टक्के सूट देण्यात आली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान गतवर्षी मे महिन्यात सवलत योजनेचा लाभ घेत तब्बल २५ कोटींचा भरणा झाला होता. मात्र ही वसुली यंदाच्या मे महिण्यात घटली असल्याचे चित्र आहे. हा आकडा चौदा कोटींच्या पुढे सरकु शकला नाही.
महापालिकेने नियमित करदात्यांसाठी सुरु केलेल्या करसवलत योजनेत मे महिन्यात तेरा कोटी ७९ लाख वसुली झाली आहे. २९ हजार लाभार्थ्यांनी सहा टक्के सवलतीचा लाभ घेत ४५ लाख ९० हजारांची सूट पदरात पाडली. पण गतवर्षीची आकडेवारी पाहता यंदा वसुलीचा रिव्हर्स गिअर पहायला मिळत आहे.
नवीन नाशिक मधील नागरिकांनी करसवलत घेण्यात आघाडीवर असून त्यांनी दोन कोटी ९२ लाखांचा भरणा केला. त्या खालोखाल नाशिकरोड विभागाचा क्रमांक लागतो. पण गतवर्षी मे महिन्यात तब्बल पंचवीस कोटी भरणा झाला होता. गतवेळेच्या तुलनेत यंदा वसुलीत अकरा कोटींची घट पहायला मिळत आहे. दरम्यान चालू जून महिन्यातही करसवलत योजना सुरु असून एकूण रक्कमेवर तीन टक्के सूट मिळवता येईल. त्यास नाशिककरांनी बंपर प्रतिसाद दिला. तब्बल एक लाखांहून अधिक नागरीकांनी ५२ कोटींचा भरणा केला. गतवर्षी त्याच कालावधीत हा आकडा २९ कोटी इतका होता. यंदा एप्रिल महिन्यात तब्बल २२ कोटी मालमत्ता कर वसुली सरपल्स पहायला मिळाली. मे महिन्यात तीन टक्के सवलत दिली जाते. यंदा ती सहा टक्के करण्यात आली. पण एप्रिलच्या तुलनेत काहिसा थंड प्रतिसाद मिळाला. २९ हजार नागरिकांनी कर भरणा करत सहा टक्के सुटची संधी साधली.मे महिन्यात तेरा कोटी ७९ लाख मालमत्ता कर नागरिकांनी भरला.
मे महिन्यातील वसुली
न.नाशिक – ५७४१ – २ कोटी ९२ लाख
ना.रोड – ६९९० – २ कोटी ८५ लाख
सातपूर – ३४४३ – १ कोटी ५८ लाख
ना.पश्चिम – ३०७५ – १ कोटी ९८ लाख
ना.पूर्व – ५०२५ – २ कोटी १० लाख
पंचवटी – ४८७८ – २ कोटी ३३ लाख
Ashvini Pandeअश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.