एकटी अबला नारी काही करू शकत नाही. तिला आधाराची गरज असते, ही समाजाची मानसिकता, समज कामकाजातून आणि कष्टाच्या जोरावर खोटा ठरविला आहे. महिलेने ठरविले तर ती आकाशालाही गवसणी घालू शकते, असे महिरावणीच्या अश्विनी वाघ सांगतात.
2012 मध्ये लग्न झाल्यानंतर अश्विनी प्रवीण वाघ यांचे पती कामानिमित्त गावाला गेले होते, पण तिथे त्यांना सर्पदंश झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. पती गेल्यानंतर दुःखाचा डोंगरच कोसळला. माझ्या सोहम आणि पूर्वा या मुलांची जबाबदारी माझ्यावर आली. गृहिणी होते. त्यामुळे बाहेरचे जग माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी. जगाचे व्यवहार माहिती नव्हते. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न ’आ’ वासून होता. मुलांना सांभाळायचे होते, पण सुरुवातीला काही मार्ग सुचत नव्हता. सुरुवातीला घरगुती जबाबदार्या आणि बाहेरच्या जगाचे अज्ञान यामुळे अवघड वाटले. बचतगट सुरू केला आणि गावातील महिलांच्या मदतीने, मेहनतीने स्वतःसाठी व्यवसायाची संधी निर्माण केली.
बचत गटाच्या माध्यमातून अश्विनी पंचायत समितीत निवडल्या गेल्या आणि त्यांच्यासोबत मेस/खानावळ व्यवसाय सुरू केला. एकल महिला म्हणून कुटुंब आणि व्यवसाय चालवणे कठीण आहे, पण वेळेचे नियोजन योग्य केले तर अशक्य काही नाही, अशा आश्वासक शब्दांनी त्यांनी इतर महिलांना प्रेरणा दिली. आज त्या फक्त एक यशस्वी उद्योजिका नसून, समाजासाठी प्रेरणास्रोेत आहेत. पती संसार अर्ध्या प्रवासात सोडून गेले असले, तरी अप्रत्यक्षपणे कायमस्वरूपी माझ्यासोबत आहेत. मला माझ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल घडवायचे आहे.
The innings broke down halfway through, but…
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…