नाशिक

साहित्यातून वंचितांचा हुंकार होण्याची गरज

 

नाशिक ः प्रतिनिधी

साहित्य हे वैश्विक जाणिवेचे असावे. तुम्ही आणि साहित्य वेगळे नाही, या भावनेतून लिखाण झाल्यास ते एकजिनसी होईल अन् त्याच साहित्यातून खर्‍या अर्थाने वंचितांचा हुंकार झाला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ कवी, साहित्यिक, लेखक प्रा. वा. ना. आंधळे यांनी व्यक्त केली.

वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीतर्फे समाजाचे पहिले एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. 25) रावसाहेब थोरात सभागृहात पार पडले. त्यावेळी अध्यक्षस्थानाहून आंधळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  स्वागताध्यक्ष प्रशांत आंधळे,  संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे,  वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे,  डॉ. लक्षराज सानप, मुंबई येथील डॉ. विजय दहिफळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड,  भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, कांचन खाडे, गणेश खाडे, ज्येष्ठ उद्योजक बुधाजी पानसरे, दामोदर मानकर, माधुरी पालवे, के. के. सानप, मारुती उगले, दिव्यांग आघाडीचे बाळासाहेब घुगे, लेखिका लता गुठे, लक्ष्मण जायभावे, रणजित आंधळे, तानाजी जायभावे आदी मान्यवर उपस्थित होते.

आंधळे  म्हणाले की, साहित्यातून सामाजिक विषमता मांडता आली पाहिजे. ती वाचन, अनुभवातून येते. मला आजोबांकडून कवितांचा वारसा मिळाला. साहित्य, समाज अन् नात्यापलीकडे साहित्य असते. सामूहिक पद्धतीने लढा दिल्यास त्याला यश मिळते. त्यामुळे येथून पुढे देखील अधिक ताकद लावून साहित्य संमेलन भरवून, समाजाला चांगली दिशा देण्याचे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमवेत आपला समाज व्यापारी, शेतकरी आणि आज विविध क्षेत्रांत आघाडीवर असल्याचे आंधळे म्हणाले.

हुंडा पद्धत, वाढते घटस्फोट, बेरोजगारी हे समाजातील मुख्य प्रश्न असून, ते सोडवण्यासाठी संघटित होण्याची गरज असल्याचे आवाहन डॉ. लक्षराज सानप यांनी केले.  विचारांबरोबरच समाजाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी महासंघ काम करत असल्याचे ते म्हणाले. समाज सर्व क्षेत्रात आघाडीवर असून, ही वाटचाल अशीच सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे  भटक्या विमुक्तच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष कांचन खाडे आणि भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष  डॉ. मंजुषा दराडे यांनी यावेळी

सांगितले.

साहित्यात समाज घडविण्याची ताकद आहे. त्यामुळे समाजाभिमुख उत्तमोत्तम साहित्य निर्माण व्हायला हवे, अशी अपेक्षा गणेश खाडे यांनी व्यक्त केली. संमेलनास राज्यातील विविध भागासह  गुजरात, राजस्थान तेलंगणासह राज्यभरातून समाजबांधव सहभागी झाले होते.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago