नाशिक

सत्तेचा ताम्रपट घेऊन आले नाही राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई :

सत्ता येते .. सत्ता जाते .. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही . उद्धव ठाकरे तुम्ही पण नाही . राज्य सरकारला माझे सांगणे आहे . आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका , अशा शब्दांत खरमरीत पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे . राज ठाकरेंनी भोंग्यांच्या प्रश्नी मनसे कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या धरपकडीवर आक्रमक भूमिका घेतली आहे . आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका , असा इशारा देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला आहे .
भोंगे उतरवा ‘ आंदोलनावरून गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांचीदडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की , मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का ?, असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले , महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे . आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत . जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैदराबाद संस्थानातले रझाकार आहेत ! अर्थात , महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी , दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन , तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत . तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं . राज्य सरकारला माझे एकच सांगणं आहे . आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका . सत्ता येत जात असते . कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही . उद्धव ठाकरे , तुम्हीही नाही !

Ashvini Pande

Recent Posts

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

4 hours ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

4 hours ago

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोर‘धार’; धरणांतून विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…

4 hours ago

सरदवाडी धरण ओव्हरफ्लो; भोजापूरच्या पूरचार्‍यांना सोडले पाणी

आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…

4 hours ago

किचन ट्रॉलीच्या कंपनीला भीषण आग

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…

4 hours ago

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…

5 hours ago