‘गरज सरो वैद्य मरो’ची अनुभूती; नगरसेवक फोन उचलेना
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, पण निवडणुकांनंतरचे राजकीय वास्तव मात्र धक्कादायक आहे. वर्षानुवर्षे जपले गेलेले ’झाले इलेक्शन, जपा रिलेशन’ हे तत्त्व जणू इतिहासजमा झाले आहे. त्याऐवजी आता ’गरज सरो आणि वैद्य मरो’, अशीच स्थिती दिसून येते.
निवडणूक काळात एकमेकांच्या जीवावर उठणारे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे, एकमेकांकडे न पाहणारे उमेदवार निकालानंतर मात्र चहापान, मनोमिलन, भेटीगाठी यांमधून सगळे विसरून पुढे जात असत. हार-जित असो, नातेसंबंध जपणे हीच खरी राजकारणाची परंपरा होती. मतदारांचे आभार मानण्यासाठी मिरवणुका, कार्यकर्त्यांना सन्मान, भेटीगाठी असा उत्साह पाहायला मिळायचा. मात्र, यंदाचे चित्र वेगळेच आहे.
निवडून आलेल्या नगरसेवकांना फोन केला तर कॉल उचलला जात नाही, कधी थेट कट केला जातो. निवडणुकीत जीव ओतून काम करणार्या कार्यकर्त्यांनाही आज गरज सरो वैद्य मरोचा अनुभव येत आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आलेले नगरसेवक मोठ्या उन्मादात वागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. सोशल मीडियावरही हा उन्माद स्पष्टपणे दिसतो आहे. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर नितेश राणे यांनी टाकलेला छद्मी हसतानाचा व्हिडीओ, ठाकरे गटाच्या पराभवावर केलेली उन्मादात्मक पोस्ट यावरून राजकारण किती सूडाचे झाले आहे, हे अधोरेखित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद साजरा करा, पण तो उन्माद वाटेल असे व्यक्त होऊ नका, अशी समज देऊनही कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणार्या पोस्ट थांबत नाहीत. नाशिकमध्येही याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. सोमवार पेठेतील शिवसेना उमेदवार गणेश मोरे यांच्या घरासमोर अज्ञातांनी फटाके फोडून शिवीगाळ केली. जेलरोड परिसरात एका उमेदवाराला मारहाण झाली. कुणी हरले म्हणून त्याच्या घरासमोर फटाके, कुठे धमक्या, कुठे हाणामारी हे चित्र लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. निवडणूक संपली तरी वैर संपलेले नाही, उलट ते अधिक तीव्र झाले आहे. असंतोष, असूया आणि सूडाचे राजकारण एखाद्याच्या मृत्यूचेही कारण बनू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. झाले इलेक्शन, जपा रिलेशन हा विचार पुन्हा जिवंत करण्याची गरज असताना, राजकारण अधिकच कटू होत चालले आहे.
The trend of ‘elections done, Japa Relation’ has been banished
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…