नाशिक

साडेतीनशे कोटींच्या अमृत योजनेला आठवड्याचा मुहूर्त

शहरातील जीर्ण जलवाहिन्या बदलणार

नाशिक : प्रतिनिधी
शहरात तीस वर्षांपूर्वी टाकलेल्या जीर्ण जलवाहिन्या बदलून नव्याने टाकण्यात येणार आहेत. यासाठी साडेतीनशे कोटींचा खर्च येणार आहे. विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून निविदा राबविल्याचा संशय आल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. नंतर काढलेल्या फेरनिविदेत पाच संस्थांनी सहभाग नोंदवला. कागदपत्रांची तपासणी सुरू असून, येत्या काही दिवसांत 342 कोटींच्या कामाला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

शहराची लोकसंख्या सन 2050 पर्यंत 55 लाखांच्या घरात पोहोचणार असून, नागरिकांची तहान भागविणे मनपासाठी मोठे आव्हान आहे. सुरळीत पाणीपुरवठा व नव्या जलवाहिन्या टाकण्यासाठी केंद्राने अमृत-2 योजनेतंर्गत मनपाने 342 कोटींच्या योजनेला मंजुरी दिली असून प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. पन्नास टक्के खर्च केंद्र करणार आहे.
राज्य सरकार व महापालिका पंचवीस टक्के खर्च करेल. एप्रिल अखेर या निविदेची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लागण्याची शक्यता आहे. नव्याने निविदा काढण्यात आली असता त्यात पाच कंपन्यांनी सहभाग घेतला. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अमृत दोन योजना शहरासाठी वरदान ठरणार आहे. यातून संपूर्ण शहरासह नवीन वसाहतीत जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्यांचे आयुर्मान तीस वर्षापेक्षा अधिक आहे. यामुळे पाणी गळतीची मोठी समस्या असून अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. परिणामी नागरिक रोष व्यक्त करतात. यासाठी अमृत-2 योजनेतंर्गत तब्बल 342 कोटी खर्चून शहरात जलवाहिन्यांचे जाळे विस्तारले जाणार आहे.

या कंपन्यांचा सहभाग

  • लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस
    कोया अ‍ॅण्ड कंपनी कन्स्ट्रक्शन्स
    जे डब्ल्यू इन्फ्रा
    इगर इन्ग्रा
    भूगन इन्फ्राकॉन
Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

14 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

14 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

14 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

14 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

14 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

15 hours ago