नाशिक

साडेतीनशे कोटींच्या अमृत योजनेला आठवड्याचा मुहूर्त

शहरातील जीर्ण जलवाहिन्या बदलणार

नाशिक : प्रतिनिधी
शहरात तीस वर्षांपूर्वी टाकलेल्या जीर्ण जलवाहिन्या बदलून नव्याने टाकण्यात येणार आहेत. यासाठी साडेतीनशे कोटींचा खर्च येणार आहे. विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून निविदा राबविल्याचा संशय आल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. नंतर काढलेल्या फेरनिविदेत पाच संस्थांनी सहभाग नोंदवला. कागदपत्रांची तपासणी सुरू असून, येत्या काही दिवसांत 342 कोटींच्या कामाला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

शहराची लोकसंख्या सन 2050 पर्यंत 55 लाखांच्या घरात पोहोचणार असून, नागरिकांची तहान भागविणे मनपासाठी मोठे आव्हान आहे. सुरळीत पाणीपुरवठा व नव्या जलवाहिन्या टाकण्यासाठी केंद्राने अमृत-2 योजनेतंर्गत मनपाने 342 कोटींच्या योजनेला मंजुरी दिली असून प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. पन्नास टक्के खर्च केंद्र करणार आहे.
राज्य सरकार व महापालिका पंचवीस टक्के खर्च करेल. एप्रिल अखेर या निविदेची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लागण्याची शक्यता आहे. नव्याने निविदा काढण्यात आली असता त्यात पाच कंपन्यांनी सहभाग घेतला. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अमृत दोन योजना शहरासाठी वरदान ठरणार आहे. यातून संपूर्ण शहरासह नवीन वसाहतीत जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्यांचे आयुर्मान तीस वर्षापेक्षा अधिक आहे. यामुळे पाणी गळतीची मोठी समस्या असून अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. परिणामी नागरिक रोष व्यक्त करतात. यासाठी अमृत-2 योजनेतंर्गत तब्बल 342 कोटी खर्चून शहरात जलवाहिन्यांचे जाळे विस्तारले जाणार आहे.

या कंपन्यांचा सहभाग

  • लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस
    कोया अ‍ॅण्ड कंपनी कन्स्ट्रक्शन्स
    जे डब्ल्यू इन्फ्रा
    इगर इन्ग्रा
    भूगन इन्फ्राकॉन
Gavkari Admin

Recent Posts

पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी मनसे महिला कार्यकर्तीच्या कानशिलात लगावली

इंदिरानगरमध्ये  ठिय्या, पोलीस निरीक्षकावर मारहाणीचा आरोप सिडको विशेष प्रतिनिधी :-इंदिरानगर पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर वादग्रस्त…

3 hours ago

निर्यातशुल्क वेळेत रद्द न केल्याने कांद्याचे भाव पडले

माजी खासदार शेट्टी ः योग्य वेळी पाऊल उचलणे आवश्यक होते लासलगाव ः वार्ताहर सध्या कांद्याला…

10 hours ago

‘सीटू’चा तहसील कार्यालयावर मोर्चा

इगतपुरीत शेतकरी, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन इगतपुरी ः प्रतिनिधी तालुक्यातील शेतकरी व कामगारांच्या विविध समस्या…

11 hours ago

हरणूल, हरसूलच्या शिवारात बछड्यांसह बिबट्याचा मुक्त संचार

सोग्रस : चांदवड तालुक्यातील हरणूल व हरसूलच्या शिवारात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बछड्यांसह बिबट्याचा…

11 hours ago

मोह शिवारात विहिरीत पडून काळविटाचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील मोह येथे 60 फूट खोल विहिरीत पडून काळवीटाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी…

11 hours ago

पुस्तके माणसाला समृद्ध करतात : गाडगीळ

सावानाच्या वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण नाशिक : प्रतिनिधी पुस्तकांत माणसांना समृद्ध करण्याची शक्ती असते. पुस्तक वाचनातून…

11 hours ago