कारवाई करण्याची देशमुख यांची मागणी
मालेगाव : तालुक्यातील घोडेगाव शिवारात असलेल्या सुकी नदीपात्रातून गेल्या काही महिन्यांपासून वाळूचा अमर्याद उपसा सुरू आहे. यामुळे नदीपात्रात मोठ मोठे खड्डे पडले असून, वाळूचा हा अमर्याद उपसा तातडीने थांबविण्याची मागणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक ए.ए. देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागाच्या सर्व संबधित अधिकार्यांना निवेदन दिले आहे. मालेगाव तालुक्यात घोडेगाव येथे सुकी नदी आहे.
या नदीला सद्या पाणी नाही. त्यामुळे याचा गैरफायदा घेत वाळूचा उपसा केला जात आहे. जेसीबीच्या सहाय्याने वाळूचा उपसा केल्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडत असल्याने भविष्यात नागरिकांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे हा वाळूचा उपसा थांबवावा, असे निवेदन देऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, संबधित विभागाने या निवेदनाची दखल देखील घेतलेली नाही. महसूल अधिकारी कर्मचारी आणि संबधित वाळू ठेकेदारांचे काही साटे लोटे आहे की काय? असा संशय यामुळे येत आहे. जिल्हाधिकार्यांनी तातडीने दखल घेऊन वाळूचा उपसा बंद करावा, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…