तंबाखूच्या पुड्या दिल्या नाही म्हणून तलवारी नाचवल्या

म्हसरूळ गावात स्वयंघोषित भाईंचा प्रताप

पंचवटी : वार्ताहर
स्वयंघोषित भाईने तंबाखूच्या पुड्या मागितल्या त्या दे’ म्हणत म्हसरूळ गावातील जैन मंदिरा जवळील पान टपरीवर एका स्वयंघोषित भाईच्या दोन मित्रांनी पानटपरीवर राहाडा घालून धुमाकूळ घातल्याचा प्रकार घडला आहे . यावेळी पानटपरी चालकाने पुड्या देताना नाक मुरडताच, या दाेघांनी काहीवेळात पुन्हा परत येत हातात धारदार तलवारी आणूण पानटपरीवर तोड फोड करून जीवे मारण्याची धमकी देत पळ काढला. याबाबत टपरीचालक भूषण देशमुख याने  दोन संशयतांच्या विरोधात म्हसरुळ पोलीस ठाण्यात फिर्याद नाेंदविली.
याबाबत माहिती अशी की, भूषण कैलास देशमुख(य ३१ रा. मार्गारेट टाॅवर, शरणपूर गावठाण, कॅनडा कॉर्नर) याच्या फिर्यादीनुसार त्याचे म्हसरुळ गावातील जैनमंदिराजवळ गणेश नावाचे पान स्टाॅल आहे. भूषण पान टपरी चालवत असतांना त्याची ओळख परिसरातील युवराज सोनवणे, वैभव व सिद्धार्थ यांच्याशी झाली आहे. ते नेहमी टपरीवर येऊन गुटखा, बार, सिगारेट घेत असत . पण भूषण २५ जून राेजी सायंकाळी सहा वाजता तवली फाट्यावरुन मोटारसायकलने टपरीवर येत असतांना त्याचा भाऊ हर्षद देशमुख हा टपरी चालवत हाेता. त्याने भूषणला फाेन करुन टपरीवर दोन ते तीन तरुण आले आहेत .त्यांनी सांगितले की ‘युवराज अण्णाने दोन-तीन तंबाखुच्या पुड्या मागितल्या आहे. तेव्हा भूषणच्या फाेनवरुन युवराज सोनवणेचा मित्र भूषणशी बोलला की ‘युवराज आण्णाला तंबाखुच्या पुड्या दे’ तेव्हा भूषणने युवराजच्या मित्राला
रागात सांगत ‘पुड्याच कशाला पूर्ण पुडाच घेऊन जा’ म्हणाला. त्यावेळी भाऊ हर्षद याला उभ्या असलेल्या तरुणांना तीन तंबाखुच्या पुड्या देण्यास सांगितले. त्यानंतर पुड्या घेऊन ते तिघे तरुण निघून गेले. ताेपर्यंत भूषण हा टपरीवर एकटा असतांना रात्री आठ वाजता युवराज सोनवणेचा साथीदार वैभव व सिद्धार्थ हे टपरीवर आले. त्यांनी हातातील तलवार टपरीच्या कांउटरवर आपटून धमकी दिली. ‘तु आमच्या युवराज भाईला शिवीगाळ करतो का ? असे म्हणूण शिवीगाळ केली आणि ‘तु टपरीच्या बाहेर ये, युवराज भाईने आम्हाला तुझा गेम करण्यासाठी पाठवले आहे असे म्हणताच भूषण टपरीबाहेर येत नसल्याने संशयितांनी तलवारी नाचवत धिंगाणा घालत टपरीतील साहित्याचे नुकसान करून पान टपरीतील माल बाहेर फेकुन दिला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईगिरी वाढली

पानटपरीवर तंबाखूच्या पुढे देत नाही म्हणून नंग्या तलवारी नाचून धिंगाणा घालण्यात आला. जर पान टपरीतील तरुण बाहेर आला असता तर त्याचा जीव घ्यायलाही भाईच्या कार्यकर्त्यांनी मागेपुढे बघितले नसते. त्यामुळे भाईगिरी वाढत असल्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी टवाळखोर भाईगिरी करताना दिसत आहे याकडे जर पोलिसांनी वेळीच लक्ष दिले नाही तर म्हसरूळ तसेच म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीत वाढ व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पोलीस आता तरी रस्त्यावर उतरून आपला टवाळखोरांच्या बाबतीत पोलीस दाखवणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. वेळीच याबाबत पोलीस दक्ष झाले नाही तर भविष्यात मोठा अनर्थ घडू शकतो.

Bhagwat Udavant

Recent Posts

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

3 hours ago

मनमाडला कांदे ट्रॅक्टरमध्ये भरताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…

6 hours ago

शेतकरी ओळखपत्र आजपासून अनिवार्य

8 लाख 75 हजार 912 शेतकर्‍यांची फार्मर आयडीकडे पाठ सिन्नर : भरत घोटेकर कृषी विभागाच्या…

6 hours ago

घोटेवाडीत सहा ट्रॉली कडब्यासह 55 टन मुरघास आगीत भस्मसात

दोन लाखांचे नुकसान; ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या तोंडचा घास हिरावला सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील घोटेवाडी येथील…

6 hours ago

नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन सायकल भेट

नाशिक : प्रतिनिधी भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या दातृत्वाने नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन…

7 hours ago

डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध घटनांचे उपनगरला प्रदर्शन

उपनगर वार्ताहर: उपनगर-गांधीनगर संयुक्त जयंती समितीतर्फे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्यावेगळ्या प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी…

7 hours ago