टोमॅटो पिकाला चिरा; खर्चही निघेना

अवकाळीमुळे शेतकरी हतबल; आर्थिक गणित बिघडले

अस्वली स्टेशन : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात काही दिवसांपूर्वी पडलेल्या बेमोसमी पावसामुळे टोमॅटो पिकाला चिरा पडल्यामुळे शेतकर्‍यांना कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. नीचांकी बाजारभावामुळे शेतकर्‍याचे आर्थिक स्रोत बिघडले.
शासकीय धोरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. वाहतूक खर्चही निघत नसल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाला आह. मोठा खर्च करून पिकविलेला टोमॅटोे जनावरांचे खाद्य बनले आहे.
खते, बी- बियाणे, औषधे महाग झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकर्‍यानी शेतीत काय नियोजन करायचे कोणते पीक घ्यायचे? या संभ्रमात शेतकरी सापडला आहे. टोमॅटोला एका बिघ्याला एक लाख खर्च येतो. बांबू, तारी, खते, औषधे, तणनाशक, टॉनिक आदी घ्यावे लागतात. रोपे नर्सरीतून एक रुपया 40 पैसे काडीप्रमाणे शेतकरी आणतात, त्याचे संवर्धन करून तारी बांधणी मजूर व शेतमजुरी 15 रुपये जाळीप्रमाणे खुडतात. मशागत सुतळी, तार बांबू आदींसाठी खर्च येतो. शासनाने दखल घ्यावी, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

शेतीस लागणारे उपयुक्त खते ड्रीप, पाइप, औषधे बी-बियाणे सर्व महाग झाल्यामुळे शेती ना परवडणारी झाली. त्यात वातावरणाचा परिणाम, शेतकरी पूर्ण मोडकळीस आलेला आहे. शासनाने शेतकर्‍यांसाठी काहीतरी चांगली उपाययोजना आखावी शेतकरी जर संपला, तर सर्वच संपुष्टात येईल.
– नंदू सहाणे, शेतकरी, साकूर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *