नाशिक

नदीपात्रासह वाहतूक बेटांचे  सुशोभीकरण होणार

 

 

 

प्रलंबित कामे मार्गी लावा, स्वच्छ सर्वेक्षण बैठकीत सूचना

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

 

स्वच्छ सर्वेक्षण च्या अनुषंगाने शहरातील नदीपात्राची सफाई आणि रस्ते स्वच्छतेसह कच-यापासून खत निर्मितीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावरील दुभाजकांची स्वच्छता करून दुभाजकांमध्ये रोपे लावणे, पादचारी मार्गाची स्वच्छता व दुरुस्ती याबरोबरच वाहतूक बेटांची स्वच्छता व सुशोभिकरण केले जाणार आहे. तसेच ज्या विभागात प्रलंबित कामे आहेत. ती तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी आढावा बैठकीत दिल्या.

 

महानगरपालिकेच्या पंचवटी विभागाची आढावा बैठक नुकतीच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत सर्व विभागांचा आढावा घेण्यात येऊन प्रलंबित कामे तत्परतेने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने नागरिकांमार्फत वर्गीकरण केलेला कचरा घंटागाडीमार्फत संकलीत करणे, कचरा वर्गीकरण करण्याबाबत प्रबोधन करणे याबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. आस्थापनांमध्ये ओल्या कच-यापासून कम्पोस्ट खत निर्मिती करण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. शौचालय दुरुस्ती, उद्यानातल्या कारंज्यांची दुरूस्ती तसेच टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून आकर्षक वस्तू, खेळणी तयार करणे याबाबतही बैठकीत चर्चा झाली. नदीपात्राची सफाई, पावसाळी नाल्यांची साफसफाई तसेच जाळ्या बसविणे बाबतच्या सुचना देण्यात आल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२३च्या अनुषंगाने प्रतिक्रिया देण्याबाबत (सिटीजन फिडबॅक) नागरिकांना प्रोत्साहित करणे, अनधिकृत जाहिरात फलक काढण्याबाबत यावेळी सांगण्यात आले. तसेच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विभागात वॉल पेंटिंग व शहर सौंदर्यीकरणाची कामे केली जाणार आहेत. बैठकीसाठी कार्यकारी अभियंता पी. एन. निकम, उपअभियंता राजेश पालवे, विभागीय स्वच्छता निरिक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक तसेच बांधकाम विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (मलनि:स्सारण) विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

5 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

5 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

6 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

6 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

6 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

6 hours ago