नाशिकरोड : प्रतिनिधी केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशात काही ठिकाणी युवकांकडून विरोध होत आहे . रेल रोको केला जात आहे . त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही रेल्वे वेळापत्रकावर परिणाम झाला . काही गाड्या रद्द करण्यात आल्या . तर काही विलंबाने धावत असल्याचे रेल्वेने सांगितले . बिहारवरून येणारी पाटलीपुत्र , पटणा वास्को , पवन या तीन गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या . मुंबईहून बिहारला जाणारी भागलपूर , पवन , जनता एक्स्प्रेस , स्पेशल हॉलिडे या रद्द करण्यात आल्या . बिहारवरून येणारी महानगरी एक्स्प्रेस चार तास , गोदान तीन तास उशिराने धावली . काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले . नाशिक रोडमार्गे मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून उत्तर भारतात सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांना आंदोलनाचा फटक प्रामुख्याने बसत आहे . बिहारमधील पाटलीपुत्र भागलपूर येथून मुंबईला रवाना होणाऱ्या प्रवासी रेल्वेगाड्या उत्तर भारतातील आंदोलनामुळे काल रद्द करण्यात आल्या होत्या . अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन असेच सुरू राहिले तर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडू शकते . गैरसमजातून सुरू झालेले हे आंदोलन आणखीन किती काळ सुरू राहणार हे स्पष्ट होत नसल्यामुळे रेल्वे वेळापत्रकाबाबतही अनिश्चितता आहे . आणि
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…