नाशिक

देशाची व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर

मोदी, मोहन भागवत यांच्यावर टीका

नाशिकः नोटा बंदीचा अधिकार हा पंतप्रधानाचा नसून, रिझर्व बँकेचा आहे. पाकीस्तानच्या सीमेवर जाऊन युध्द करण्याची भाषा करणाऱ्या मोहन भागवत यांच्याकडे शस्त्र परवाना आहे का ?हे अगोदर त्यांनी जाहीर करावे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत हे देशातील सर्वात मोठे चोर आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी केले.

नाशिकच्या ईदगाह मैदानावर शनिवारी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी संघ व पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टिका केली. व्यासपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, अंजली आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, वांचीतच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर, अशोक सोनवणे, राजेंद्र पतोडे, महासेभेचे नाशिकः जिल्हाध्यक्ष प्रविण बागुल, वंचितचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, शहराध्यक्ष अविनाश शिंदे आदी उपस्थित होते.
ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सर्वच नेत्यांना मोदी यांच्या मागे उभे राहावे लागत आहेत. विरोधात भूमिका घेणाऱ्या सत्तेचा कोणत्याही पक्षाच्या प्रमुखांवर नेत्यांवर ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सच्या चौकश्या लावण्यात आल्या आहेत. नोटाबंदी बाबत न्यायालयाने मोदींच्या वकीलांना चांगलेच फटकारले आहेत. तुम्हाला मोदी, भागवत या दोघांनाही जेल मध्ये बघायचे असेल तर सत्ता बदलावी लागेल. त्यामुळे २०२४ च्या निवडणूकीसाठी आत्तापासूनच कामाला लागा. मोदींच्या विरोधातील सर्व नागरिकांपर्यंत जाऊन त्यांना आपल्याकडे आणा. देशात पंतप्रधानांच्या तोडीचा दुसरा माणूसच नाही असे बिंबवले जात आहे. अंन दुर्देवाने आपण सर्व त्याला बळी पडत आहोत. मोदींच्या विरोधात बोलणारे पक्ष आणि खासदार अजूनही जिवंत आहेत, त्यामुळे त्यांच्या चुकीच्या निर्णयाना दोन्ही सभागृहात नक्कीच विरोध होणार आहे. आरएसएस देशासाठी धोकादायक असुन, त्यांना नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे, अशा आशयाचे पत्र लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री असताना पंतप्रधान पंडित नेहरू यांना पाठविले होते, असा खळबलजनक आरोप ॲड आंबेडकर यांनी केला. नरेंद्र मोदी, अमीत शहा अन् भाजपा मुळे देश हुकूमशाही कडे वाटचाल करत आहेत.देशातील जनतेला महागाईच्या खाईत लोटले असून, हे सर्व थांबवीण्यासाठी सर्वांनी आजपासूनच कामाला लागावे, असे आवाहन ॲड आंबेडकर यांनी केले. धम्म परिषदेस बौध्द भिक्कुसह डॉ.आंबेडकर यांचे हजारो अनुयायी उपस्थित होते.

 

थेट पंतप्रधान निवडीचे प्रयत्न सुरू

केंद्र सरकारकडून व्यवस्था बदलण्याचे काम सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांचे तर आता थेट पंतप्रधान निवडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हळू हळू भारतातील सर्व नागरिकांचा मेंदु ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालला आहे. असे झाल्यास या देशात न्हावी, कुंभार, लोहार, आदिवासी, कोळी, भटके विमुक्त कधीच पंतप्रधान होणार नाहीत. म्हणजेच तुमचा पंतप्रधान होण्याची संधीच हुकणार आहे. खासदारांची संधी काढून तुम्हाला कायमचे बंदीस्त केले जाण्याची भीती देखील आंबेडकरांनी व्यक्त केली.

 

चीन प्रश्नी मोदी यांची ५६ इंच छाती १४ इंचावर जाते

चीनचा प्रश्न समोर आला की मोदी यांची ५६ इंच छाती १४ इंचावर जाते. चीन व अमेरीकेचे खेळाचे ॲप बंद करण्याचे नाटक केंद्र शासनाकडून सुरू आहे. बंदीच आणायची ते मग चीनचे पेमेंट गेट वे बंद करून दाखवा असे आव्हानच ॲड. आंबेडकर यांनी मोदी यांना दिले. दरवर्षी या ॲप द्वारे ८ ते १० हजार कोटी रुपये भारतातून ट्रान्स्फर होत आहेत. १५ दिवसांपूर्वीच चीन ने आपली २५०० स्केअर फुट जागा ताब्यात घेतल्याचा गौप्यस्फोटही आंबेडकर यांनी केला. मोदी हे सैन्य पिटाळून लावल्याची खोटी माहिती देत आहेत. संसदेत आपल्या खासदारांनी त्याबाबतचे प्रश्न विचारल्यास खरा त्याला मोदींकडून बगल दिली जात असल्याचा आरोपही केला,

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago