पावसामुळे दोन शेतकऱ्यांच्या विहिरी कोसळल्या

पावसामुळे दोन शेतकऱ्यांच्या विहिरी कोसळल्या

लासलगाव:-समीर पठाण

पंधरा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सोमवारी निफाड पूर्व भागात हजेरी लावत दोन तास धुवांधार बॅटिंग केली होती.त्यानंतर झालेल्या पावसाने गोंदेगाव (ता.निफाड) येथील दोन शेतकऱ्यांच्या विहिरी कोसळल्याने सुमारे साडे अकरा लाखांचे नुकसान झाले आहे.

कारभारी विठ्ठल नाईक यांच्या ४०८/०१ या गट नंबरमधील ६१ फूट खोल विहिरीचे १४ कठडे पावसामुळे पडल्याने साडे सात एच पी क्षमतेची इलेक्ट्रिक मोटार आणि कनेक्शनसह दाबल्या गेल्याने साडे सहा लाखांचे नुकसान झाले.तर गट क्रमांक ३९६ मधील पंढरीनाथ गणपत निकम आणि संजय निकम यांची सामाईक ५६ फुल खोल विहीर,१५ सिमेंट, इलेक्ट्रिक मोटार आणि कनेक्शन असे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी पराग साळवे यांच्यासह सहायक शरद खंडीझोड,कोतवाल किशोर गाढे यांनी स्थळपाहणी करत पंचनामा केला.यावेळी कृष्णा शिरापुरे,विजय नाईक,नवनाथ निकम,प्रतीक नाईक आदी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *