पावसामुळे दोन शेतकऱ्यांच्या विहिरी कोसळल्या
लासलगाव:-समीर पठाण
पंधरा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सोमवारी निफाड पूर्व भागात हजेरी लावत दोन तास धुवांधार बॅटिंग केली होती.त्यानंतर झालेल्या पावसाने गोंदेगाव (ता.निफाड) येथील दोन शेतकऱ्यांच्या विहिरी कोसळल्याने सुमारे साडे अकरा लाखांचे नुकसान झाले आहे.
कारभारी विठ्ठल नाईक यांच्या ४०८/०१ या गट नंबरमधील ६१ फूट खोल विहिरीचे १४ कठडे पावसामुळे पडल्याने साडे सात एच पी क्षमतेची इलेक्ट्रिक मोटार आणि कनेक्शनसह दाबल्या गेल्याने साडे सहा लाखांचे नुकसान झाले.तर गट क्रमांक ३९६ मधील पंढरीनाथ गणपत निकम आणि संजय निकम यांची सामाईक ५६ फुल खोल विहीर,१५ सिमेंट, इलेक्ट्रिक मोटार आणि कनेक्शन असे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी पराग साळवे यांच्यासह सहायक शरद खंडीझोड,कोतवाल किशोर गाढे यांनी स्थळपाहणी करत पंचनामा केला.यावेळी कृष्णा शिरापुरे,विजय नाईक,नवनाथ निकम,प्रतीक नाईक आदी शेतकरी उपस्थित होते.
जखमींवर होणार निशुल्क उपचार, क्लिनिक, कार्डिओ रुग्णवाहिकेत अत्याधुनिक सुविधा, गोंदे टोलप्लाझावर 4 जुलैपासून प्रारंभ सिन्नर…
बेकरी प्रॉडक्ट जळून खाक; सिन्नर शहराजवळ बारागावपिंप्री रस्त्यावर घडली घटना सिन्नर : प्रतिनिधी मध्य प्रदेश…
ठाकरे गटाला मोठा धक्का: चार दिवसांपूर्वी नियुक्त केलेले महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजपात करणार प्रवेश उपनेते…
पावसाळ्यात केस जास्त गळतात का? डॅन्डरफ जास्त होतो का? पावसाळ्यात केस जास्त गळतात आणि डॅन्ड्रफदेखील…
वरण-सुरणाची आमटी, भात -भगर, भाजी-भोपळा, पोळी-राजगिर्याचे फुलके, चटणी-नारळाची, चिंचेची, खजुराची, सुरणाची, कोशिंबीर -काकडीची, लोणचे- लिंबाचे…
भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच एक आधारस्तंभ मानली गेली आहे. आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी…