कपडे धुण्यासाठी  तलावावर गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू

कपडे धुण्यासाठी  तलावावर गेलेल्या

दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथील बिल्व तिर्थ तलावावर धुणं धुण्यासाठी गेलेल्या मुलींचा मृत्यू घडल्याची दुर्दयी घटना घडली आहे. त्र्यंबक नगर परिषद तीन दिवसांत एकदा पाणी पुरवठा करत आहे. तो देखील अनियमित व अपुरा असल्याने नागरिक मिळेल तेथून पाणी आणतात, धुणं धुतात याचा हा बळी ठरला आहे.त्र्यंबकेश्वर येथील तनुजा युवराज कोरडे, वय 13 वर्षे चौकीमाथा, अर्चना बाळू धनगर, वय 13 वर्षे
चौकिमाथा या दोन मुली सकाळी 11 वाजेच्या सुमारास
बिल्व तीर्थ येथे कपडे  धूत असताना पाय घसरल्याने अर्चना पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी तनुजा गेली असता ती देखील बुडाली.ही माहिती मिळताच नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. मुलींना बाहेर काढले मात्र तो पर्यंत त्या मयत झाल्या होत्या. बिल्व तिर्थ तलाव काही वर्षापूर्वी गाळ व मुरूम काढून खोल केला तेव्हा पासून येथे पाण्यात बुडून जीवित हानी होण्याच्या घटना घडत आहे. तसेच त्र्यंबकेश्वर येथे नळ पाणीपुरवठा वेळेत होत नाल्याने अशा प्रकारे नागरिक पाण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

10 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

10 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

10 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

10 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

10 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

10 hours ago