कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या
दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथील बिल्व तिर्थ तलावावर धुणं धुण्यासाठी गेलेल्या मुलींचा मृत्यू घडल्याची दुर्दयी घटना घडली आहे. त्र्यंबक नगर परिषद तीन दिवसांत एकदा पाणी पुरवठा करत आहे. तो देखील अनियमित व अपुरा असल्याने नागरिक मिळेल तेथून पाणी आणतात, धुणं धुतात याचा हा बळी ठरला आहे.त्र्यंबकेश्वर येथील तनुजा युवराज कोरडे, वय 13 वर्षे चौकीमाथा, अर्चना बाळू धनगर, वय 13 वर्षे
चौकिमाथा या दोन मुली सकाळी 11 वाजेच्या सुमारास
बिल्व तीर्थ येथे कपडे धूत असताना पाय घसरल्याने अर्चना पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी तनुजा गेली असता ती देखील बुडाली.ही माहिती मिळताच नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. मुलींना बाहेर काढले मात्र तो पर्यंत त्या मयत झाल्या होत्या. बिल्व तिर्थ तलाव काही वर्षापूर्वी गाळ व मुरूम काढून खोल केला तेव्हा पासून येथे पाण्यात बुडून जीवित हानी होण्याच्या घटना घडत आहे. तसेच त्र्यंबकेश्वर येथे नळ पाणीपुरवठा वेळेत होत नाल्याने अशा प्रकारे नागरिक पाण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…