नाशिक

येवल्यात बेमोसमी पावसाने गहू, कांदा पिकांचे नुकसान

येवला : प्रतिनिधी
येवला शहरासह तालुक्यातील अनेक भागात जोरदार वार्‍यासह बिगरमोसमी पावसामुळेे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतातील गहू, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
येवला शहरात मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान जोरदार पाऊस बरसला. अर्धातास झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. तालुक्यातील अनेक भागात पाऊस बरसल्याने काढणीला आलेला गहू आडवा झाला असून, वार्‍यामुळे दाणे गळण्याचे प्रमाण वाढले आहे. मुख्य पीक असलेल्या कांद्याची काढणी सुरू असतानाच पाऊस झाल्याने साठवणूक केलेला आणि शेतात असलेला कांदा सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “अचानक आलेल्या पावसामुळे उभ्या गव्हाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक जमिनीला टेकल्याने आता उत्पादनात मोठी घट होईल,“ अशी माहिती येवला-बदापूर रोडवरील शेतकरी अशोक पवार यांनी दिली. सतत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

राज्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. यातच आता मुंबई, ठाणे आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात झालेल्या पावसामुळे थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावत शेतकर्‍यांच्या चिंतेत मोठी भर घातली आहे. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरात सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Unseasonal rains damage wheat, onion crops in Yeola

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago