विषबाधा झाल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

इगतपुरी आश्रमशाळेतील प्रकार, दोन विद्यार्थी गंभीर
इगतपुरी : प्रतिनिधी
शहरातील मतिमंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून किंवा पाण्यातून विष बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, उलटया होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर दोन विद्यार्थी अत्यावस्थ असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच चार विद्यार्थ्यांवर इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करत असून, एवढी मोठी घटना घडूनही इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप इंगोले व भरारी पथक अधीक्षिका डॉ. स्वरूपा देवरे मात्र गैरहजर असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
इगतपुरी शहरात अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधीर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र असे मतिमंद विद्यालय चालवणार्‍या संस्थां आहे. या विद्यालयात 120 विद्यार्थी असून, मंगळवारी रात्री खिचडीचे जेवण केल्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास यातील 8 विद्यार्थ्यांना उलटयाचा त्रास सुरू झाला. यामुळे या विद्यार्थ्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर दोन दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. चार विद्यार्थ्यांवर येथे उपचार सुरू आहेत. हर्षल गणेश भोईर, (23, रा. भिवंडी, जि. ठाणे) व मोहम्मद जुबेर शेख, (11 रा. नाशिक) या दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. प्रथमेश बुवा, (17) व देवेंद्र कुरुंगे (15) या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकला पाठवण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी खालेल्या अन्नाचे नमुने घेण्यात आले असून, या घटनेत मृत झालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह पुढील उत्तरीय तपासणी साठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. ग्रामीण रुग्णालयात पोलीस उप अधीक्षक अर्जुन भोसले, पोलीस, निरीक्षक वसंत पथवे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, मुख्याधिकारी पंकज गोसावी, नायब तहसीलदार प्रवीण गुंडाळे, आरोग्य निरीक्षक यशवंत ताठे यांच्यासह शहरातील विविध पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी पावसाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

2 days ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

2 days ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

2 days ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

2 days ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

2 days ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

2 days ago