पाऊस, पितृपक्षामुळे भाजीपाला कडाडला

किचन बजेट कोलमडले; महागाईमुळे डाळही शिजेना

नाशिक ः प्रतिनिधी
पावसाने गेल्या आठवड्यापासून संततधार लावल्याने भाजीपाला आवकेत घट झाली आहे. गौरी-गणपतीत
भाज्यांचे दर काहीसे स्थिर असले, तरी आता पितृपक्ष पंधरवड्यात पितरांना नैवेद्यासाठी लागणार्‍या भाज्यांचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. सततचा पाऊस व पितृपक्षात ठरावीक भाज्यांंना मागणी वाढण्याची शक्यता आहे.
मेथी, गवार, कारले व शेवगा आदींचे भाव वाढले असून, पालक, शेपू, कांदापात या पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याने बाजारात भाज्यांंचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. गौरी-गणपतीसाठी 16, 21 भाज्यांना मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने दर वाढण्याची शक्यता होती; परंतु दरवाढ न झाल्याने गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला होता. हिरवी मिरची किंवा इतर भाज्यांची आवक जास्त झाल्यास दर घसरतात, तर आवक कमी झाल्यास दर वाढतात. पितृपक्ष पंधरवड्यात मेथी, गवार, कारले, भेंडी, डांगर यांंच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे येत्या दिवसांत या भाज्यांच्या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

असे आहेत दर ः

मेथी- 25 ते 30 रुपये जुडी, कारले- 30 ते 40 रुपये किलो, गवार- 70 ते 80 रुपये, गावठी गवार- 100 रुपये किलो, डांगर- 15 ते 20 रुपये, ढोबळी मिरची- 40 ते 50, कोबी- 10 ते 15 रुपये गड्डा, फ्लॉवर- 15 ते 25 रुपये, आले- 30 ते 60 रुपये किलो, बटाटे- 25 ते 30 रुपये, टोमॅटो- 20 ते 25 रुपये किलो, गिलके- 50 रुपये किलो, दोडके- 60 रुपये किलो, घेवडा- 50 रुपये किलो, वाल- 50 ते 60 रुपये किलो, हिरवी मिरची- 50 ते 60 रुपये किलो, शेवगा- 70 ते 80 रुपये किलो, कोथिंबीर- 10 ते 30 रुपये जुडी, पालक, शेपू, कांदापात- 10 ते 30 रुपये जुडी.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *