महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात 39 हजार मतदारांची वाढ

नाशिक : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या निवडणूका होऊ घातलेल्या असल्याने या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदरीने गती घेतल्यचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणूकानंतरच्या पाच महिन्यांमध्ये तब्बल 39 हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीमध्ये 16,159 मतदाराला पुरुष असून 23,522 महिलांनी पुढाकार घेतला आहे. यात मोठ्या प्रमाणात शहर परिसरातून नोंदणीचा ओघ असल्याचे दिसून येत आहे.
मतदान जनजागृती अभियानांतर्गत मतदारांची नोंदणी करणे हा महत्त्वाचा भाग निवडणूक प्रशासनाने जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत 20 नोव्हेंबर 2024 रोजी 50 लाख 61 हजार 185 मतदारांची नोंदणी होती. 4 एप्रिल 2025 रोजी हीच संख्या 51 लाख 883 एवढ्या मतदारांची नोंद झालेली आहे. यात 39 हजार 698 मतदारांनी नाव नोंदणी वाढल्याचे दिसून येत आहे
नाशिक पश्चिम मतदार नोंदणीत आघाडी घेतली असून,5 महिन्यांमध्ये 10,622 मतदारांनी नोंदणी केली आहे. त्या पाठोपाठ देवळाली विधानसभा मतदारसंघात 5,764 मतदार नोंदणी झाली आहे.
नाशिक मध्य मध्ये 3,013, निफाड मध्ये 3,268, नांदगाव मध्ये 2,866, मालेगाव बाह्य मध्ये 2,786, येवल्यात 2,208, इगतपुरी 2,112, दिंडोरीत 2,681, सिन्नर मध्ये 1,778, चांदवड मध्ये 1,743, मालेगाव मध्ये 1,519 अशी मतदार नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हातील तृतीय पंथी मतदारांच्या संख्येतही 17 ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Gavkari Admin

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

20 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

20 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

20 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

20 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

20 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

21 hours ago