राष्ट्रवादी-शिवसेना-रिपब्लिकन सेना युतीचा वचननाम्यात निर्धार
नाशिक शहरात वृक्षतोड न करता विकास केला जाईल, असा पुनरुच्चार युतीच्या नेत्यांनी केला आहे. नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी जाहीरनाम्यात ठोस उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत. गोदावरीच्या उपनद्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या नद्यांचे ‘अक्विफर मॅपिंग’ करून त्यांना बारमाही वाहते केले जाईल. सातपूर औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी यंत्रणा तातडीने कार्यान्वित करून गोदावरी आणि नंदिनीला प्रदूषणमुक्त केले जाईल. गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या किनारी बांबूची लागवड करून नैसर्गिक तटबंदी निर्माण केली जाईल, असेही युतीच्या नेत्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत मध्य प्रदेशातील इंदूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर आहे. मात्र, आगामी काळात नाशिकला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनविले जाईल. त्यासाठी घंटागाड्यांची संख्या वाढवून कचर्याचे संकलन केले जाईल. नाशिक शहरातील रस्त्यांवर सध्या खूप खड्डे आहेत. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा सुधारणे, महापालिकेचा कारभार ऑनलाइन आणि पारदर्शक करणे, फाळके स्मारकाचे रूपडे बदलणे, तारांगणाला पुनरुज्जीवित करणे, शहरात बस आणि रिक्षा सेवेचा दर्जा वाढविणे, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणे, झोपडपट्टीमुक्त शहर करणे, नाशिकला आयटी पार्क कार्यान्वित करणे आदी बाबींचा वचननाम्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
सिंहस्थासाठी हे करणार
नाशिक विमानतळावर दुसरी धावपट्टी, टर्मिनल 2, इमिग्रेशन चेक पोस्ट, आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रिलिजियस कॉरिडॉरमध्ये हवाई वाहतूक प्रस्तावित करणे, नाशिक शहरासह जिल्ह्यात मोबाइल टॉवर्स 5 जी करणे, एसटीच्या 500 बसेस उपलब्ध करणे, डबल डेकर 50 ई-बस प्रस्तावित करून नाशिक कुंभमेळा 2027 मध्ये सार्वजनिक वाहतूक प्रोत्साहित करणे, त्र्यंबकेश्वरला डॉपलर वेदर रडार उभारणे, नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा विकास, मनमाड-कसारा तिसरा व चौथा रेल्वेमार्ग, 200 खाटांचे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आदी कामे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केली जाणार असल्याचे वचननामामध्ये नमूद करण्यात आले आहे.
We will make Nashik the cleanest, greenest and most beautiful.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…