विकेंड पाण्यात

 

नाशिक : प्रतिनिधी

शहरात गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या पावसाच्या जोरदार बॅटिगमुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले असून काल रविवार असतानाही शहरातील बाजारपेठेत शांतता असल्याचे चित्र होते. आठवड्यातील शनिवार आणि रविवारी नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यात रविवार असल्याने शहर परिसरात शांतत जाणवत होती.

विकेंडला अनेकाकडून आऊटिंगचे प्लॅन करण्यात येतात. मात्र, मात्र शहरासह जिल्हाभरात जोरदार पाऊस सुरू असल्याने नदी,नाले ,ओढ्यांना पुर आल्याचे चित्र आहे.जिल्हयाच्या अनेक भागात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण  झाल्याने पावसाळी पर्यंटनाला जाणार्‍यांची संख्या रोडावली आहे. तर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र पावसामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केल्याचे पाहवयास मिळाले. त्याच प्रमाणे विकेंडला मुव्हि आणि हॉटेलिंकला जाणार्‍यांची संख्या मात्र अधिक असल्याचे चित्र होते.

नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसावर आला असल्याने घरोघरी  तयारी करण्यात येते. मात्र मुसळधार पावसामुळे अनेक कामांना ब्रेक लागला आहे. पावसात बाहेर फिजल्यापेक्षा रविवारचा दिवस कुटूंबासोबत घरच्या घरीच एन्जॉय करणे नाशिकरांनी पसंत केले आहे.

 

व्यावसायिकांना फटका

मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे            व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. मेन रोड, दहिपूल   , शालिमार या ठिकाणी रस्त्यालगत  व्यवसाय करणार्‍या य्यावसायिकांना सतत सुरू असणार्‍या पावसामुळे  व्यवसाय  बंद ं ठेवावा लागत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमिवर खरेदीसाठी मोठी गर्दी होत असताना  पावसामुळे व्यवसाय बंद ठेवावा लागत अससल्याने मोठे नुकसान व्यवसायिकांना सहन करावे लागत आहे. तर पावसामुळे  विक्रीसाठी ठेवण्यात आलेले साहित्य भिजत असल्याने                                                              व्यावसायिक मेटाकूटीला आले आहेत.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

11 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

11 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

11 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

11 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

11 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

12 hours ago