अग्रलेख

का रे दुरावा? का रे अबोला?

दुसर्‍यांदा सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विक्षिप्त वागण्याने जगाची चिंता वाढली आहे. सत्तेवर येताच त्यांनी अनेक देशांवर टेरिफ बॉम्ब टाकला. त्यातून भारतही सुटला नाही. अमेरिका नेहमीच स्वतःला जगाचा पोलीस समजत आली आहे. आता ट्रम्प हे जगाचा बिग बॉस बनू पाहत आहेत. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवणार होते. मात्र, युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनी त्यांना चांगलीच चपराक लगावली. काही महिन्यांपूर्वी इस्रायल-हमास यांच्यात संघर्ष पेटला, तेव्हा त्यांनी नाहक इराणशी पंगा घेतला.
आपल्या दबंगगिरीचा परिचय देत त्यांनी व्हेनेझ्युएलावर कारवाई केली. हा एक सार्वभौम देश आहे. असे असताना अमेरिकन लष्कराने त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीचे अपहरण केले. त्यांना कैदी बनवून अमेरिकेत आणले. आता त्यांच्यावर खटला चालविला जाणार आहे. पुन्हा एकदा इराण- अमेरिका संघर्ष वाढला आहे.
सुरुवातीला भारतावर त्यांनी तब्बल 25 टक्के टेरिफ लावले. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारात भारत अमेरिकेला अधिक निर्यात करतो आणि कमी आयात होते. याचा भारताला फायदा होतो, ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी टेरिफ लावले आणि भारताने अमेरिकेकडून जास्त आयात करावी, असा अट्टाहास करत आहे. या विरोधात त्यांना अनेक देशांनी खडे बोल सुनावले. मात्र, भारताकडून फारशी प्रतिक्रिया दिली गेली नाही. भारत नवीन बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने त्यांनी दावा केला की, माझ्यामुळेच दोन्ही देशांतील युद्ध थांबले. त्याचा ते वारंवार पुनरुच्चार करत आहेत. मात्र, याबाबत भारताने अनेकदा याचा इन्कार केला आहे. पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत काहीच बोलत नाहीत. भारतातून कृषी उत्पादने, अवजारे, औषधे, वैद्यकीय साहित्य, इलेक्ट्रॉनिक ऊपकरणे, स्टील, अ‍ॅल्युमिनियम यांसारख्या वस्तू निर्यात केल्या जातात. अमेरिकेतील उद्योगपती, व्यावसायिक इतर देशांतून स्वस्त आयातीचा प्रयत्न करतील. परिणामी आपल्या निर्यातीवर याचा विपरीत परिणाम होऊन आपले परकीय चलनदेखील घटणार आहे. त्याचबरोबर मागणी तसा पुरवठा या सूत्राप्रमाणे जर मागणीच नसेल तर उत्पादनदेखील थांबणार आहे आणि एकूणच अर्थचक्रावरदेखील परिणामहोणार आहे. आजवर कृषीसंबंधी उत्पादन, अवजारे यांचा बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये समावेश नव्हता. मात्र, आता अमेरिकेतून भारताला अनेक कृषी उत्पादने आयात करावी लागणार आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो. त्या पैशांचा वापर युक्रेन युद्धासाठी होतो, असे कारण सांगून त्यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लावला. परिणामी भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आणि भारताला अमेरिकेकडून महाग तेल खरेदी करावी लागत आहे.
एवढ्यावरच ट्रम्प यांचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी रशिया, ब्राझील, भारत या तीन देशांवर तब्बल पाचशे टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला आणि तसा कायदा पास करून घेतला. आता लवकरच त्याची अंमलबजावणी होऊ शकते. तसे झाले तर भारतातून अमेरिकेत होणार्‍या निर्यातीवर याचा मोठा विपरीत परिणाम होऊन अर्थव्यवस्था आणखीच विस्कळीत होईल. वास्तविक ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीत व्यक्तिशः ट्रम्प आणि मोदी यांच्यात चांगले संबंध होते. आता मात्र तसे संबंध राहिलेले नाहीत. दोघांमध्ये संवादाचा अभाव दिसतो. टेरिफबाबत चर्चा होत नाही. बॅलन्स ऑफ ट्रेडसाठी चर्चा करावी यासाठी अमेरिकेने तीन आठवडे वाट पाहिली. मात्र, भारताकडून चर्चा झाली नाही, असे अमेरिकचे परराष्ट्रमंत्री म्हणतात. मध्यंतरी ट्रम्प मी नाराज असून, मोदी मला खूश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्याची मोठी चर्चा होत आहे. दोघांमध्ये संवाद का होत नाही याबाबत स्वतः पंतप्रधान मोदी यांनी पुढे येऊन देशाला सांगायला हवे.
शपथविधी होतानादेखील डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना बोलावले नव्हते. बदललेल्या काळात जग हे ग्लोबल व्हिलेज बनले आहे. अशा परिस्थितीत एकमेकांचे सहकार्य असणे ही काळाची गरज आहे. भारतीय उत्पादनांना नवीन बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ते वाटते तितके सोपे नाही. अशावेळी महाशक्ती अमेरिकेबरोबर कसा व्यवहार करायचा याबाबत भारतापुढे मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिका, चीन, रशिया या तीन महाशक्तींच्या सुप्त संघर्षात भारताला मात्र मोठी कसरत करावी लागते आहे. माय फ्रेंड डोनाल्ड, म्हणूनही काहीच फायदा झाला नाही. याउलट दोघांमध्ये का रे दुरावा? का रे अबोला? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडणेच हिताचे ठरेल.

Why the distance? Why the Ebola?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago