नाशिक

अवघ्या पन्नास रुपयांसाठी पत्नीचा खून

वाडीवर्‍हेची घटना; मद्यपी पतीला अटक

इगतपुरी : प्रतिनिधी
दारू पिण्यासाठी  50 रुपये दिले नाही म्हणून राग आल्याने मद्यपी पतीने लोखंडी रॉड पत्नीच्या डोक्यात मारून निर्घृण खून केल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील वाडीवर्‍हे परिसरातील सांबरवाडी (गणेशवाडी ) येथे घडली. याबाबत वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात मयताचा मुलगा राकेश मोरे याने फिर्याद दिली आहे.या घटनेबाबत वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मद्यपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.  घटनेचे गांभीर्य पाहुन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनीही घटनास्थळी भेट देत तपास कामी सूचना केल्या.
वाडीवर्‍हे परिसरामध्ये असलेली सांबरवाडी ( गणेशवाडी) येथील लालू सोपान मोरे पत्नी, मुलगा व सून यांच्या सोबत राहतो. त्यांचा मुलगा राकेश सोपान मोरे, वय 23 वर्ष हा मासे विक्रीचा व्यवसाय करतो. लालू सोपान मोरे हा दारू पिऊन रात्री घरी आला होता.  मीराबाई (45) हिच्याकडे तो 50 रुपये दारू पिण्यासाठी मागत होता. मात्र तिने नकार देताच त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.काही वेळानंतर तो घरातून निघून गेला. सर्व जणांनी जेवण केले. मुलगा राकेश व सून बाहेर पडवीत झोपण्यासाठी गेले असता मिराबाई घरात एकटीच झोपली होती.त्यानंतर रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान  लालू सोपान मोरे घरी आल्यानंतर दरवाजा लावून घेतला. पैसे न दिल्याचा राग मनात धरून  मिराबाईला मारहाण करू लागला.  लोखंडी रॉडने लालू मोरे याने तिच्या डोक्यावर, तोंडावर जोरदार प्रहार केले. यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. गोंगाट ऐकून मुलगा व सून दरवाजा वाजवू लागले.काही वेळाने लालू याने स्वतःच दरवाजा उघडून मुलाला म्हणाला की मी तुझ्या आईला मारून टाकले आहे. तुला काय करायचे ते कर. राकेश याने वेळ न दवडता 108 नंबरला कॉल करून रुग्णवाहीका बोलावून घेतली. रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मीराबाई हिला मृत घोषित केले. याबाबत त्यांनी तात्काळ वाडीवर्‍हे पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीस ताब्यात घेतले. अधिक तपास वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवर्‍हे पोलीस करत आहेत.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

3 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

3 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

3 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

3 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

3 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

3 hours ago