पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे… नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल

पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे…
नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल
नाशिकरोड : प्रतिनिधी

जेलरोड परिसरात निवृत्त मुख्याध्यापकाने आपल्या आजारी पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या दांपत्यांचे दोन्ही मुले मुंबई येथे उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की जेलरोड सावरकर नगर,एकदंत अपार्टमेंट येथील पहिल्या मजल्यावरील निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी (वय 78) हे आपल्या निवृत्त शिक्षिका असलेल्या लता जोशी यांच्यासोबत राहत होते. त्यांची दोन मुले मुंबई येथे उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करीत आहे. निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी यांच्या पत्नी लता यांना काही 2017 पासून मेंदू विकाराचा त्रास होता, त्या काही दिवस त्या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यातून त्या सावरल्यानंतर त्यांच्या आजारपणाला दोघे वृद्ध दांपत्य कंटाळले होते.संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास निवृत्त मुख्याध्यापक जोशी यांनी आपल्या पत्नी लताचा गळा दाबून तिचा तिला आजारपणापासून मुक्त केले तर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हे करण्यापूर्वी निवृत्त मुख्याध्यापक जोशी यांनी चिठ्ठी लिहून माझ्या पत्नीला मी स्वर्गलोकी पाठवले व त्यानंतर मी तिच्यासोबत जात आहे.आमच्या मरणास कोणासही कारणीभूत ठरवू नये, असे लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती या दाम्पत्यांची कामे करणारी मोलकर्णीने समजल्यानंतर तिने आरडा ओरड केली. नागरिकांनी पोलिसांना घटनेबाबत कळविल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे,पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे , गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व पथक घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Gavkari Admin

Recent Posts

महापालिकेला एक लाख वृक्ष लागवडीचे टार्गेट

प्रधान सचिवांची ऑनलाइन आढावा बैठकीत सूचना नाशिक : प्रतिनिधी शहरात पन्नास लाखांची वनसंपदा असल्याचे सहा…

13 hours ago

48 सोनोग्राफी केंद्रांची झाडाझडती

भरारी पथकांकडून शहरात धडक मोहीम नाशिक : प्रतिनिधी शहरातील गंगापूर रोडवरील पंड्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदानाचा…

13 hours ago

बत्तीस कोटींचे यांत्रिकी झाडू पावसाळ्यात फेल

वर्षभरात 55 हजार किमी रस्ते सफाईचा दावा; आता चार महिने बंद नाशिक ः प्रतिनिधी गुजरातमधील…

14 hours ago

मुलींनो, खंबीर व्हा..

प्रत्येक मुलीचे जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे, ज्यावेळी ती सासरी जाते. ज्या घरात ती वावरली, हसली,…

14 hours ago

रागावर नियंत्रण हीच आत्मविकासाची पहिली पायरी

राग ही माणसाच्या मनाची एक सहज आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. प्रत्येकालाच राग येतो. कारण सगळं…

14 hours ago

हुंडा की संस्कारांची शिदोरी?

आपलंच खाऊन आपल्याच जीवावर मोठे होणारे एक दिवस आपल्यालाच संपवायला मागे-पुढे बघत नाहीत. म्हणून नेहमी…

14 hours ago