मुंबई:
५०%आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मंगळवारी जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली.
**१२ ठिकाणी जिल्हा परिषदांच्या निवडणुका**
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर या ठिकाणी निवडणुका होतील.
**निवडणूक वेळापत्रक**
नामनिर्देशन – पत्र स्वीकारणे – १६ जानेवारी २६ ते २१ जानेवारी २६
छाननी – २२ जानेवारी
उमेदवारी माघारी अंतिम मुदत – २७ जानेवारी
अंतिम उमेदवार यादी – निवडणूक चिन्ह वाटप – २७ जानेवारी दुपारी साडेतीन नंतर
मतदान – ५ फेब्रुवारी
मतमोजणी – ७ फेब्रुवारी सकाळी १० पासून