नाशिक : प्रतिनिधी
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्यावतीने भारत रंग महोत्सवाचे शनिवारपासून (दि.18) ते गुरूवार (दि.23) पर्यंत
कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी 6 वाजता आयोजन केले आहे. एनएसडीच्यावतीने भारत रंग महोत्सवाचे देशभरातील दहा शहरात आयोजन केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संगीता टिपले,सुरेश गायधनी,मनपा उपायुक्त विलास बैरागी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज नाशिकमध्ये भारत रंग महोत्सवाचे उद्घाटन
मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, एनएसडीचे संचालक प्रा.रमेश चंद्र गौर, लेखक अभिराम भडकमकर,सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभीषण चौरे , अंजली कानेटकर यांच्या उस्थितीत होणार आहे.
ही नाटके सादर होणार :
18 फेब्रु-संगीत मत्स्यगंधा (मराठी)
19 फेब्रु-सोल टू सोल (इंग्लिश )
20फेब्रु-विश्वामित्र (मराठी)
21फेब्रु-साॅलिट्युड(मल्याळम)
22फेब्रु-है मेरा दिला(हिंदी)
23 फेब्रु-संगीत सुवर्णतुला(मराठी)