पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

पावसाळ्यात आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण या काळात अनेक आजार आणि समस्या वाढतात. खालील गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही पावसाळ्याचा आनंद सुरक्षितपणे घेऊ शकता.

आरोग्याची काळजी ः
पाण्याचे सेवन ः पिण्यासाठी नेहमी शुद्ध आणि उकळलेले पाणी वापरा. बाहेर जाताना आपले स्वतःचे पाणी सोबत ठेवा. नळाचे किंवा विहिरीचे पाणी थेट पिऊ नका.
आहार : ताजे आणि गरम अन्न खा. फ्रिजमधील थंड पदार्थ, पेये आणि भाज्या टाळा. कारण यामुळे वात आणि कफ वाढू शकतो.
पचायला हलके आणि ताजे पदार्थ खा. जसे की, भात, गहू व भाजलेल्या डाळींपासून बनवलेले पदार्थ.
कडू, तिखट आणि तुरट चवीचे पदार्थ कमी खा. लसूण, आले, हिंग, हळद, मिरे यांसारख्या मसाल्यांचा आहारात योग्य वापर करा.
मांसाहार आणि मासे शक्यतो टाळा. कारण या काळात पचनशक्ती मंद असते आणि मांस दूषित होण्याची शक्यता असते.
हिरव्या पालेभाज्या शक्यतो टाळा किंवा खाताना खूप स्वच्छ धुवा. कारण त्यावर जीवाणू, विषाणू आणि अळ्या वाढण्याची शक्यता असते.
बाहेरचे उघड्यावरचे अन्न आणि शिळे अन्न खाणे टाळा. दूषित मांस आणि फळे (उदा. आंबे) खाऊ नका.
स्वच्छता
पावसात भिजल्यास लगेच अंग आणि केस कोरडे करा. बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ साबणाने धुऊन कोरडे करा. नियमित नखे कापा. संसर्ग टाळण्यासाठी हात वारंवार साबणाने धुवा. विशेषतः जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर आल्यावर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *