‘जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक’ चर्चेविना मंजूर
नवी दिल्ली : प्रतिनिधी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 10 व्या दिवशी शुक्रवारी विरोधी पक्षांच्या प्रचंड गदारोळात लोकसभेत ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, 2026’ चर्चेविना संमत करण्यात आले. विरोधी सदस्यांच्या निदर्शनांमुळे आणि जोरदार घोषणाबाजीमुळे सभागृहात निर्माण झालेल्या गदारोळातच सरकारने हे महत्त्वाचे विधेयक मांडून ते मंजूर करून घेतले.
या नवीन सुधारणा विधेयकामध्ये जन्म आणि मृत्यूच्या विलंबाने होणार्या नोंदणीबाबतचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. जन्म व मृत्यूच्या नोंदी वेळेत व्हाव्यात, बनावट दाखल्यांना आळा बसावा आणि नागरिक नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक व डिजिटल व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. विलंबाने होणार्या नोंदींसाठी आता कडक पडताळणी प्रक्रियेतून जावे लागणार आहे. विरोधकांनी पोलिसांची कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून लावलेल्या धरण आंदोलनामुळे या विधेयकावर सभागृहात सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. मात्र, प्रशासकीय सुलभता आणि डिजिटल डेटाबेस अद्ययावत करण्यासाठी हे विधेयक आवश्यक असल्याचे सांगत सरकारने गदारोळातच हे विधेयक लोकसभेत संमत केले.
Opposition uproar in Lok Sabha