आगीमुळे वन्यजीवांना धोका 

निफाड: प्रतिनिधी
जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असलेल्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात सोमवारी वणवा पेटल्याची घटना घडली. या आगीमुळे हजारो पक्ष्यांच्या अधिवास व जैवविविधता धोक्यात आली आहे.
निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणावर स्थित असलेल्या तसेच महाराष्ट्राचे भरतपूर असलेले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य येथे दरवर्षी देश-विदेशातून हजारो पक्षी डेरेदाखल होतात. या पक्ष्यांना बघण्यासाठी देशभरातील पक्षिमत्र येतात. अभयारण्य क्षेत्रात चापडगाव येथील पक्षी निरीक्षणाच्या शेवटच्या टॉवरजवळ गोदावरी काठावर वणवा भडकला. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *