format: 0; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 13107200;cct_value: 0;AI_Scene: (11, 0);aec_lux: 131.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 31;
ना. नितीन गडकरी : वाहतूक कोंडीबाबत नागपूरला बैठक
नाशिक : प्रतिनिधी
द्वारका येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथील परिस्थितीचा अभ्यास करून कळंबोलीच्या धर्तीवर पूल बांधण्याचे आदेश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिले.
नाशिक येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. सिंहस्थाच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गासंदर्भात करावयाच्या सुधारणांच्या बाबत नागपूर मुख्यमंत्री सचिवालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदामंत्री व सिंहस्थ मंत्री गिरीश महाजन, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार देवयानी फरांदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी आगामी सिंहस्थापूर्वी द्वारका येथील उड्डाणपुलाचे काम करणे गरजेचे आहे, असे नमूद केले. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी उपस्थित असणारे एमएसआरडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीक्षित व मुख्य अभियंता हांडे यांना द्वारका सर्कलचा अभ्यास करून कळंबोलीच्या धर्तीवर पूल तयार करण्याचे आदेश दिले. तसेच छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी द्वारका सर्कलच्या अलीकडे एक्झिट दिले आहे. त्यानंतर कुठेही एक्झिट दिलेले नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी सर्व वाहतूक ही द्वारका सर्कलमार्गे जाते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी व छ. संभाजीनगरहून येणार्या वाहनांसाठी द्वारका सर्कलनंतर छ. संभाजीनगर नाक्यापर्यंत उड्डाणपुलावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी नवीन मार्ग करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. द्वारका येथील अंडरपास पादचारी मार्ग हे कोणत्याही प्रकारच्या उपयोगाचे नसल्याने बंद करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्पाधिकारी ढगे यांना याबाबत पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश नितीन गडकरी
यांनी दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, महापालिका शहर अभियंता संजय अग्रवाल आदींसह मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भुयारी मार्ग निरुपयोगी असल्याने तो बंद करावा, अशी मागणी आ. देवयानी फरांदे यांनी केली. यावर ना. नितीन गडकरी यांनी यासंदर्भात अहवाल देण्यास सांगितले आहे.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…