संपादकीय

एक पोकळी हृदयस्पर्शी

काळजातला लामणदिवा (पुस्तक परिक्षण)

 

पुस्तक- काळजातला लामणदिवा

लेखिका- सौ. सविता दौलत दरेकर

प्रकाशन- परिस पब्लिकेशन, पुणे.

प्रकाशन वर्षे २०२२

मुखपृष्ठ- अरविंद शेलार

मूल्य- ३०० रू.

एकूण पृष्ठ- १३६

 

एक पोकळी हृदयस्पर्शी

 

एका पारिवारिक कार्यक्रमात मला “काळजातला लामणदिवा” ही हृदयस्पर्शी कादंबरी सदिच्छा भेट मिळाली.

मुखपृष्ठ आणि कादंबरीच नाव हे दोन्ही गोष्टी काळजाची उत्सुकता वाढवणारे हृदयाचा ठोका चुकवणारे तर आहेच पण त्याहुनही बापलेकीची ही कथा अंतर मनाला स्पर्श करणारी आहे…

आपल्या आयुष्यात आपण आई किंवा वडील दोघांपैकी कुणा एकाशी आपण जास्त जवळ असतो. दोघांचं व्यक्तीमत्व वेगळे असतं. काही घरांमध्ये आई माया, जीव लावणारी असते तर वडील कडक शिस्तप्रिय असतात. तर काही घरांमध्ये वडील माया करणारे असतात तर आई ही शिस्तप्रिय असते. आपल्या लेकरांवर खरं तर दोघांचही निर्विवाद, निस्वार्थ प्रेम असतंच पण काही वेळा त्यांच्या हितासाठी कठोरही व्हावे लागते. तर काही वेळा प्रेमळ व्हावे लागते.

या कादंबरीत सई चे वडील मुख्य आधार आहे. ही कथा वडीलांनी दिलेल्या आशीर्वादरुपी मंत्राला समर्पित आहे. जो मंत्र प्रत्येक बाप आपल्या लेकीला देत असतो. आणि तो मंत्र प्रत्येक लेकीने जपलाय स्वतः च्याच मनाच्या कुपीत….

आठवणीला ना कुठलेही बंधन असते…

ना आठवणीला कुठलीही सिमा असते…

आठवणीला रंग असतो प्रेमाचा…

आठवणींना गंध असतो भावनांचा…

लहानपणा पासून वडिलांनी दिलेला आशिर्वाद की, *दिल्या घरी सुखी राहा* हा मंत्र ही सई ने पाळला आणि आपल्या वडिलांच्या स्वप्नांना ते या जगात नसताना मोठ्या जिद्दीने, मेहनतीने, विरोध स्विकारून ही पुर्ण केलं….

संघर्ष हा खुप गोष्टींचा असतो. प्रत्येकाला आयुष्यात संकट, अडचणी यांचा सामना करावा लागतो. काही वेळा संघर्ष हा भावनिक असतो. आपल्या प्रिय व्यक्तीच्या विरहाच्या उणीव भासण्याचा त्यांच्या विरहात, त्यांच्याच आठवणींना आधार बनवुन आयुष्यात पुढे जावेच लागते. त्यांच्या बरोबर घालवलेले ते शेवटचे बहुमोल क्षण हे आपल्यासाठी उरलेल्या आपल्याच आयुष्यासाठी त्यांच्याकडून मायेच्या स्पर्शाची, निस्वार्थी प्रेमाची शिदोरीच असते….

त्यांच्या स्वप्नांच्या पुर्तीसाठी आपण संघर्ष करतो. असाच संघर्ष सई ने ही केला आहे. निसर्गाची आवड असणाऱ्या बाबांनी सांगितलेली निसर्गाची किमया, शिकवण तिच्या मनावर बालपणापासूनच पेरली. सईच नातं निसर्गाशी एकरूप झाले.

सई ने तिच्या बाबांनी दिलेल्या स्वप्नांना तिनं तिचं ध्यैय बनवले. शिकुन मोठं व्हावं या ध्यैयापर्यंत पोहचण्यासाठी सईची धडपड ही नदीच्या प्रवाहासारखीच आहे. मार्गात जरी अडथळे आले तरीही तिचा प्रवाह कुणी थांबवू शकले नाही.

काही संघर्ष, दुःख हे आपले एकाकी असतात. ते एकटेपणानेच भोगावे लागतात. विश्वाच्या मालकाशिवाय त्यांचा साक्षीदार दुसरा कुणीही नसतो. आपल्या प्रियजनांचा विरह पचवणं म्हणजे आयुष्यातील आपण गाठलेली पठार अवस्था आहे. त्या पठार अवस्थेत कशाचाही फरक पडत नाही. आपण खुप अमुल्य ठेवा कायमचा गमावला आहे. बस इतकीच काय ती खंत.

मनाला शांतता लाभत नाही….मन एकीकडे आणि शरीर एकीकडे… वडीलांना गमावल्या वर होणारा भावनिक त्रास, चिडचिड, डोक्यातील न थांबणारे विचार मग डोकेदुखी त्यांच्या आठवणी यांत शुन्यात हरवलेली सई कशी बाहेर पडली हे शिकण्यासारखे आहे. सई ने मग जी कुणी व्यक्ती नैराश्याच्या दरीत पडलेली भेटेन, दिसेल. त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचं काम केले.

ती एक प्रेरणा बनली. कुणाचं दुःख आपण नक्कीच वाटुन नाही घेऊ शकत किंवा कमी नाही करु शकत. कारण त्रास काय आहे हे फक्त सहन करणाऱ्यालाच माहित असतं. पण आपण दुःखाशी धीराने संयमानं दोन हात करु शकतो हे नक्की…फक्त आपल्या अवतीभवती सई सारखी व्यक्तीमत्व भेटली तर खरी मैत्रीची दिशा मिळेन …

सईवर खरं तर तिच्या वडीलांनी आणि आईने उत्तम संस्कार, शुध्द आचरण आणि सात्विक विचार मनात पेरले. खरच सई ही तिच्या बाबांनी तिला दिलेल्या मंत्राची त्यांच्या सात्विक विचार, गुणांची उत्तराधिकारी आहे…

*काळजातला लामणदिवा* ही खरं तर प्रत्येक बापलेकीची कथा आहे. प्रत्येक बापलेकीच्या आठवणींना उजाळा आहे. अमुल्य ठेवा आहे. जे आपल आहे तेच वैश्विक आहे. हा आभास वाचताना होतो. या लेखिकेन असंच मोठं व्हावं. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी. या लेखिकेने म्हणजेच सौ. सविता ताई ने अनेकांची प्रेरणा व्हावं आणि असंच गरजवंताच्या दुःखी, अधीर , व्याकुळ मनाला नैराश्याच्या दरीतुन बाहेर काढत प्रेरणा देणार लिखाण करावं हिच अंत:करणातुन मनापासून सदिच्छा…

 

©सौ. श्रध्दा जाधव बोरसे

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago