मायेचे हृदय हे प्रेम, वात्सल्य, आभाळमाया यांनी भरलेल असतं. ती करुणामय मायमाऊली असते म्हणूनच तिला माय म्हणत असावेत.
असे म्हटले जाते की, माय मरो अन् मावशी जगो. मायची माया मिळाली नसेल तर ती एखाद्या तुटलेल्या सरीतून मोती विखुरले जावेत तशी ती आपल्या सभोवताली विखुरली आहे. तिला ओळखावे तिची संवेदना मनामनांत असावी. मायेचा सुगंध हा सर्वत्र पसरलेेला आहे. आपल्या काळ्या मातीलाही असा सुगंध लाभला आहे. हा सुगंध आपणही दरवळू द्यावा. त्यास मोकळी वाट मिळावी. जसा कधी भुंग्याप्रमाणे फुलातील मुग्धरस अलगद टिपता यावा…या निसर्गसृष्टीत, चराचरात, कणाकणात मायेची सावली वसली आहे. तिला पारखण्यासाठी अंतर्मनात भावनांना स्थान असले म्हणजे मायावी नगरी समजते. अशा नगरीत आपलेही स्वागत होते..
येथील माया ही मधाळ असावी..न मोजता येणारी…न बघता येणारी..विलक्षण…जाणिवेतून स्पर्श करणारी आभाळमाया…यात भुकेल्यास-अन्न, तहानलेल्यास-पाणी, पीडितास-दवा दुवा, वेदनेवर फुंकर, निराधारास-आधार, वाटसरूला वाट मिळत जावी..निसर्गाप्रमाणेे बहरावी.. जादूने वार्याच्या वेगात सर्वत्र पसरावी. अशी ही माया आभाळाप्रमाणे सर्वत्र व्यापलेली असेल तर आभाळमायेतून कधी प्रेमाचा, उदारतेचा वर्षाव झाला तर कोणीही मायेविना पोरका राहणार नाही.
शुभांगी माळी
मनमाड : आमिन शेख मनमाड नजीक असलेल्या रायपूर भडाने या गावातील रामदास सिताराम आहेर या…
वर्षभरात साडेचार हजार किलो प्लास्टिक जप्त नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत धोकादायक प्लास्टिक वापराला प्रतिबंध…
प्रथमच दूरदृश्यप्रणालीचा यशस्वी वापर नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने आपल्या विविध…
मौनव्रत असल्याने माध्यमांना प्रतिक्रिया नाही पंचवटी : वार्ताहर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय…
राजकीय पुनर्वसन कुठे होणार? नाशिक : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चेत आलेले…
पुन्हा चूक होता कामा नये; जिल्हाधिकार्यांना इशारा नाशिक : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या…