पिंपळगाव टोलनाका ठरतोय ‘कट पॉइंट’ मृत्यूचा सापळा

कारच्या धडकेत शिक्षिका ठार

पिंपळगाव बसवंत / दिक्षी : प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका परिसरात मंगळवारी (दि. 30) सकाळी सव्वाआठला भीषण अपघात झाला.
कादवा नदी पुलावर भरधाव कारने स्कूटीला मागून धडक दिल्याने मनीषा देवीदास निरभवणे (वय 38) यांचा मृत्यू झाला. त्या शिक्षिका असून, नेहमीप्रमाणे शाळेत शिकविण्यासाठी घरातून निघाल्या होत्या.
नाशिककडून पिंपळगावकडे येणार्‍या मारुती स्विफ्ट (एमएच 15-जीआर 1631) कारने त्यांच्या ओला इलेक्ट्रिक स्कूटीला (एमएच 15-केडी 2069) पाठीमागून जोराची ठोस दिली. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी फिर्यादी रवींद्र सुदाम निरभवणे यांच्या तक्रारीवरून कारचालक आकाश भाऊसाहेब शेवाळे याच्यावर पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेनंतर काही तासांतच याच टोलनाका परिसरात सिटीलिंक बस व मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात महिला व दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात हा अपघात राँग टर्नमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शॉर्टकट अपघातांचे कारण
टोलनाक्यालगत असलेले अवैध कट पॉइंट व साकोरे एमआयडीसीकडे जाण्यासाठी वापरला जाणारा शॉर्टकट हे अपघाताचे मुख्य कारण आहे. वेळ वाचविण्यासाठी अनेक वाहनधारक या कट पॉइंटचा वापर करतात, ज्यामुळे समोरून येणार्‍या वाहनांना अचानक अडथळा निर्माण होतो. अधिकृत रस्ता उपलब्ध असतानाही शॉर्टकट संस्कृती थांबत नसल्याने जीवघेणे अपघात वाढत आहेत.

Accused absconding in two theft cases for 18 years arrested

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *