नाशिक

40 वर्षांनंतर रस्त्याचा तिढा अखेर सुटला

श्रमदानातून नगरसूलच्या महाले वस्तीवर रस्ता तयार

नगरसूल : प्रतिनिधी
येथील महाले वस्तीवरील गेल्या चाळीस वर्षांपासून कोर्ट-कचेर्‍याच्या फेर्‍यात अडकलेला रस्त्याचा व शेतीचा वाद अखेर सामोपचाराने मिटला. त्यामुळे येथील पाच भावंडांची शेती, रहिवाशांच्या रस्त्याचा तिढा कायमचा सुटला आहे. येथील जलसंधारण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी केशवराव महाले यांनी अखेर सर्वांची समजूत काढून कोर्टकचेरीच्या फेरीत अडकलेला रस्ता आणि शेतीचा वाद एकत्र बसून घरीच मिटविला
आहे.
येथील दिवंगत शेतकरी गिरुबा सखाराम महाले यांच्या मालकीची सुमारे 25 एकर 13 गुंठे जमीन ते हयात असताना त्यांच्या पाच मुलांमध्ये 1966 मध्ये वाटणीपत्राद्वारे झाली होती. राज्य शासनाच्या तुकडे बिल कायद्यांंतर्गत बांध टाकण्यात आले. मात्र, कालांतराने शेतीचे बांध व रस्त्याचे वाद निर्माण झाले. वाद कोर्टात गेले. तारीख पे तारीख करत वर्षानुवर्षे लोटले. मात्र, शेती आणि रस्त्याचे वाद मिटले नाही.
मध्यस्थीची भूमिका घेऊन येथील केशवराव महाले यांनी अखेर सर्वांची समजूत काढून कोर्ट-कचेरीच्या फेरीत अडकलेला रस्ता आणि शेतीचा वाद घरीच मिटविला. गिरुबा महाले यांच्या पाच मुलांची जमीन कमीअधिक करून, तसेच सर्व्हे नंबरच्या दोन्ही, उत्तर आणि दक्षिणेकडील बाजूस 5-5 फूट पूर्व-पश्चिम रस्ता ठेवून वाद
मिटवला आहे. तसेच संबंधित रस्ता आणि शेतीचा कोर्टात सुरू असलेला दावा माघारी घेण्याचे सर्वानुमते ठरलेे. रस्त्याचे काम श्रमदानातून केलेे.
यावेळी सीताराम महाले, हरिकृष्ण महाले, केशव महाले, बळीराम महाले, सुदाम महाले, अनिल महाले, सुनील महाले, वामन महाले, डॉ. मनोज महाले, संतोष महाले, रामकृष्ण महाले, मनोज बोढरे, बाळू बोढरे, राजेंद्र महाले आदी उपस्थित होते. रस्ता आणि शेतीचा जुना वाद सामोपचाराने मिटविल्याने केशवराव महाले यांनी इतरही शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. रस्ता खुला झाल्याने परिसरातील रहिवाशांची गैरसोय कायमस्वरूपी दूर झाली आहे.

आमच्या कुटुंबाचा वाद बर्‍याच दिवसांपासून खितपत पडला होता. कोर्टकचेरी झाल्या, पण हा वाद मिटावा हा हेतू माझा होता. आमच्या चुलत्याची मुले, आम्ही भाऊ एकत्र येऊन या वादातून काहीच साध्य होणार नाही हे सर्वांनी ऐकले. त्यामुळे हा शेतरस्त्याचा वाद मिटला.
– केशव महाले, सेवानिवृत्त अधिकारी, जलसंधारण विभाग

Gavkari Admin

Recent Posts

राफेल विमाने आता भारत स्वत: बनवणार

मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…

11 hours ago

राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग

मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…

11 hours ago

जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला

मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा  आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…

11 hours ago

कारच्या भीषण अपघातात सहा ठार

एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…

11 hours ago

‘भरोसा’ ठेवा, निश्चित तोडगा निघेल!

पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…

12 hours ago

नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकिटे नाहीत

ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना महापालिका निवडणुकीत…

12 hours ago