नाशिक- वणी रस्त्यावर ओझरखेड जवळ एका गुलमोहराच्या झाडाच्या मध्यातुन अचानक झर्यासारखे पाणी येऊ लागले. ही वार्ता परीसरात पसरली. बघता बघता तिथे गर्दी झाली. अनेकांनी हा चमत्कार असल्याचे सांगितले. काहींनी मोबाईल मध्ये चित्रण केले. तर काहींनी तीर्थ समजुन बाटलीत ते पाणी भरून घरी नेले. सोशल मिडीयात सदरची चित्रफित पाहुन दुरून लोक येऊ लागले. कुणीही या मागचे कारण न जाणुन घेता चमत्कार समजून त्यावर विश्वास ठेवला. परीसरात या निमीत्ताने उलटसुलट चर्चेला उधाण आले. मात्र या बाबतीत खरे कारण समजल्यावर गर्दी थांबली. अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव डाॅ.टी.आर.गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.
” सदर झाडाखालून पाईपलाईन गेली आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर हे झाड लावल्याचे समजते. झाडाची मुळे खाली वाढून पाईपलाईन मध्ये शिरली . झाड जिर्ण होताच पाण्याच्या दाबामुळे मुळ ,खोड यातुन पाणी वरती आले. पाईपलाईन पाण्याचा प्रवाह थांबविला असता झाडातून पाणी येणे थांबते,याचा अर्थ हा चमत्कार नाही लोकांनी अफवांवरविश्वास ठेऊ नये ”
– कृष्णा चांदगुडे.
राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…