लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टिनवरून मोदींवर आरोप
नवी दिल्ली :
केंद्र सरकारने भारत विकला आहे. तुम्हाला देश विकण्याची लाज वाटत नाही का? तुम्ही आमची आई, भारतमाता विकली आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.
राहुल गांधी म्हणाले, की मला माहीत आहे की, पंतप्रधान सामान्य परिस्थितीत भारत विकणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे का त्यांनी भारत का विकला? कारण ट्रम्प त्यांचा गळा दाबत आहेत. त्यांनी त्यांचा गळा दाबला आहे. पंतप्रधानांच्या डोळ्यात भीती आपल्याला दिसते. राहुल म्हणाले, की भारत-अमेरिका व्यापार करारामुळे ऊर्जा सुरक्षा धोक्यात आहे. आपण युद्धाच्या काळात जगत आहोत. गाझामध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. चीन अमेरिकेला आव्हान देत आहे. आता ऊर्जा आणि वित्त शस्त्रास्त्र बनले आहे.
ते पुढे म्हणाले, की पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणतात, युद्धाचा काळ संपला आहे; परंतु आपण युद्धाच्या युगात प्रवेश करत आहोत. देशाच्या अर्थसंकल्पात जगभरातील संघर्षांच्या परिणामांना तोंड देण्याबद्दल काहीही सांगितले नाही. अर्थसंकल्पात ऊर्जा आणि वित्त शस्त्रीकरणाबद्दल काहीही नाही. राहुल म्हणाले, की देशाच्या 1.4 अब्ज लोकांसमोर एक मोठे आव्हान आहे. भारत मोठ्या प्रमाणात डेटा निर्माण करत आहे. एआयचा उदय एक मोठा धोका निर्माण करत आहे. जुन्या प्रणालींना आव्हान दिले जात आहे. डेटा एआयसाठी इंधनासारखा आहे. अमेरिका आणि चीन भारताच्या डेटावर लक्ष ठेवून आहेत. माझ्यासाठी, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक. आपले लोक आपली सर्वांत मोठी संपत्ती आहेत. ते म्हणाले, की अमेरिका आणि चीन भारतीय नागरिकांच्या डेटावर लक्ष ठेवून आहेत. जर अमेरिका महासत्ता राहायची असेल, तर भारतीय डेटा हाच मुख्य मुद्दा आहे. विरोधी पक्षनेते म्हणाले, की जर आमचेे सरकार सत्तेत असते आणि इंडिया ब्लॉक अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी करत असते, तर मी म्हटले असते, या करारावर समान अटींवर चर्चा होईल. आम्ही तुमचे सेवक नाही आहोत. आम्ही कोणाकडून तेल खरेदी करायचे, हे अमेरिका ठरवेल का? असेही राहुल गांधी म्हणाले.
शेतकर्यांना चिरडण्याचा मार्ग मोकळा…
राहुल गांधी म्हणाले, की केंद्र सरकारने व्यापार करारात गरीब शेतकर्यांना चिरडण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी असे केले नाही. इतिहासात पहिल्यांदाच आमचे शेतकरी संकटाचा सामना करत आहेत. अमेरिकेची आयात 46 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 146 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढेल. आमचे शुल्क 3 वरून 18 टक्क्यांपर्यंत वाढले आहे आणि त्यांचे शुल्क 16 टक्क्यांवरून शून्य झाले आहे. महासत्ता राहण्यासाठी अमेरिकेला भारतीय डेटाची आवश्यकता आहे.
Aren’t you ashamed of selling out the country?
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…