लासलगाव:समीर पठाण
लासलगाव सह परिसरात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे येथील दोन कांदा व्यापाऱ्यांचे कांदा शेड भुईसपाट झाले असून या शेड मध्ये असलेले अंदाजे वीस ते बावीस लाख रुपयांचे कांदे पाण्यात भिजल्याने कांद्याचेही नुकसान झाले आहे.मात्र सुदैवाने या दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित हानी नसल्याने मोठा अनर्थ टळला
शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह व जोरदार वाऱ्याच्या वेगाने पाऊस सुरू झाला.या पावसामुळे येथील कांदा व्यापारी अनिल अब्बड यांच्या वर्धमान ट्रेडिंग कंपनीचे दोन कांदा शेड वाऱ्याचा वेगा मुळे जमीनदोस्त झाले त्यात बारा लाख रुपये किमतीचे दोन शेड व अंदाजे दहा ते बारा लाख रुपयांचा कांदा असे मिळून अंदाजे वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान झाले तसेच दुसरे कांदा व्यापारी भाऊसाहेब लक्ष्मणराव जगताप यांचे जगताप अँड कंपनी यांचे ६ लाख रुपये किमतीचे शेड व अंदाजे ७ लाख रुपयांचा कांदा असे मिळून अंदाजे बारा ते तेरा लाखांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने या दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित हानी नसल्याने मोठा अनर्थ टळला
काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विक्री करण्यासाठी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे या पावसामुळे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…