नाशिक

लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार

 

 

लासलगाव:समीर पठाण

लासलगाव सह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव उद्या मंगळवार दि. 03 ऑक्टोबर पासून पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे तसेच लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपसभापती गणेश दोमाडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली असून याची सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी असे आवाहन लासलगाव बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.गेल्या तेरा दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या बंदमुळे हैराण झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्याकरता कांद्याला लिलाव बंद ठेवले होते यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असताना शेतकरी हिताकरीता लासलगाव सह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यामध्ये उद्या मंगळवार पासून कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी व लासलगाव शहरातील छोटे मोठे व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले

नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समितीत पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव सुरू होणार आहे.शेतक-यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून व्यापा-यांनी दोन पावलं मागे घेत आंदोलन मागे घेतले आहे.यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.पालकमंत्री दादा भुसे यांनी पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे.कांदा व्यापा-यांनी आपल्या काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या.यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय स्तरावर बैठक झाली.मात्र,कोणताही तोडगा निघू शकला नाही.त्यानंतर कांदा व्यापा-यांनी आंदोलन सुरूच ठेवलं होतं.मात्र शेतक-यांचं वाढतं नुकसान लक्षात घेऊन आता कांदा खरेदी-विक्री सुरू करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला आहे.व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लिलाव बंद केलेत. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेलं 40 टक्के निर्यात शुल्क कमी करावं ही प्रमुख मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती.कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यामुळं राज्यातील राजकारण देखील पेटलं होते.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

7 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

7 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

7 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

7 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

8 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

8 hours ago