लासलगाव: समीर पठाण
लासलगाव शहरात रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास
अवकाळी पावसाने हजेरी लावली.रविवारचा आठवडे बाजार असल्यामुळे परिसरातील गावातून भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची व नागरिकांची काही काळासाठी धावपळ उडाली.या वेळी वीजप्रवाह देखील खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला उन्हाळ कांदा,गहू,कांदा बियाणे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अचानक आलेल्या पावसामुळे उघड्यावरील कांदे तसेच गहू झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून नागरिकांना थोड्या वेळ का होईना दिलासा मिळाला. हवामानातील बदलामुळे शेती पिकांना फटका बसत आहे.अशातच हवामान खात्याने पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी चिंतेत आहेत.सध्या कांदा गहू,हरभरा या पिकांची काढणी सुरु आहे.अशातच अवकाळी पाऊस आल्याने पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…