लासलगावी अवकाळी पावसाने झोडपले

लासलगाव: समीर पठाण

लासलगाव शहरात रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास
अवकाळी पावसाने हजेरी लावली.रविवारचा आठवडे बाजार असल्यामुळे परिसरातील गावातून भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची व नागरिकांची काही काळासाठी धावपळ उडाली.या वेळी वीजप्रवाह देखील खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला उन्हाळ कांदा,गहू,कांदा बियाणे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अचानक आलेल्या पावसामुळे उघड्यावरील कांदे तसेच गहू झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून नागरिकांना थोड्या वेळ का होईना दिलासा मिळाला. हवामानातील बदलामुळे शेती पिकांना फटका बसत आहे.अशातच हवामान खात्याने पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी चिंतेत आहेत.सध्या कांदा गहू,हरभरा या पिकांची काढणी सुरु आहे.अशातच अवकाळी पाऊस आल्याने पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

14 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

14 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

14 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

14 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

14 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

15 hours ago